
पनवेल – राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल आणि महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे यांची काही कट्टरतावादी जिहाद्यांनी हत्या केली. हिंदूंच्या नृशंस हत्या करणार्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर आणि खालापूरच्या नायब तहसीलदार कल्याणी कदम यांच्या माध्यमातून भारत सरकारला निवेदन दिले.

हिंदूंच्या हत्यांमागील षड्यंत्राचा छडा लावावा. हत्या करणार्यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत, तसेच दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. यांसह ‘सरकारने मदरशांना निधी देणे बंद करावे, आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे त्वरित बंद करावेत’, या मागण्या निवेदनात केल्या आहेत.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !