‘माझी वसुंधरा अभियानात’ स्वच्छतेत शिर्डीचे साई मंदिर प्रथम क्रमांकावर, तर पंढरपूर दुसऱ्या क्रमांकावर !

मुंबई – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई मंदिराने ‘माझी वसुंधरा अभियानात’ राज्यात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला आहे. हे बक्षीस ३ कोटी रुपयांचे आहे. पंढरपूर देवस्थानने दुसरा क्रमांक पटकवला आहे. शेगाव, त्र्यंबकेश्वर, कोल्हापूर, जेजुरी, तुळजापूर यांना अनुक्रमे ३ ते ७ क्रमांक देण्यात आले आहेत.

देशभरातून लाखो भाविक प्रतिवर्षी शिर्डीत येतात. त्यामुळे शिर्डीतील स्वच्छता हे नगरपंचायतीसमोरील मोठे आव्हान आहे. तरीसुद्धा सलग दुसऱ्या वर्षी शिर्डी नगरपंचायतने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. याविषयी माजी नगरसेवक सुजय गोंदकर म्हणाले, ‘‘हा पुरस्कार शिर्डी ग्रामस्थांचा असून आम्ही केलेल्या कामामुळे मिळालेला पुरस्कार सर्वांना आनंद देणारा आहे.’’