भारताने नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण राखले !

स्वार्थ साधण्यासाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे कौतुक !

इम्रान खान मनापासून भारताचे कौतुक करत आहेत’, असे कुणी समजू नये. पाक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला भारताशी व्यापार करायचा आहे. त्यामुळे खान भारताला चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत ! – संपादक

पाकचे पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘क्वाड’ देशांच्या संघटनेचा भाग असलेल्या भारताने  अमेरिकेच्या निर्बंधांची भीती न बाळगता रशियाकडून कच्चे तेल आयात केले. भारताने  नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण राखले. भारताचे परराष्ट्र धोरण पाकिस्तानपेक्षा चांगले आहे, अशा शब्दांत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले.

ते खैबर-पख्तुन्ख्वा प्रांतात एका जाहीर सभेत बोलत होते.