उत्तरप्रदेशामध्ये मदरशांची संख्या २५० वरून २२ सहस्र झाल्याचाही दावा
उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांना दिले जाणारे अनुदान प्रथम बंद केले पाहिजे. त्यासाठी रघुराज सिंह यांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – देशात जितके मदरसे चालत आहेत, तेथे आतंकवादाची वाढ होत आहे. ती आतंकवादी केंद्रे बनली आहेत. सर्व आतंकवादी हे मदरशांतून शिकून बाहेर पडत आहेत. देवाने मला संधी दिली, तर देशातील सर्व मदरसे बंद केले जातील, असे विधान उत्तरप्रदेश सरकारमधील राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी केले आहे. त्यांच्या विधानाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
Madarsas produce terrorists, all terrorists have studied at madarsas, will shut them all down if given a chance: UP ministerhttps://t.co/Grqe5tTbpd
— OpIndia.com (@OpIndia_com) November 25, 2021
रघुराज सिंह पुढे म्हणाले की, ज्या प्रमाणे नागाचा फणा ठेचला जातो, तसेच आतंकवादाचे डोके ठेचले पाहिजे. राज्यातील मदरशांची संख्या गतीने वाढत आहे. पूर्वी उत्तरप्रदेशातील मदरशांची सख्या केवळ २५० होती; मात्र आता ती वाढून २२ सहस्र इतकी झाली आहे. केंद्र सरकारने यांवर बंदी घातली पाहिजे.
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !