‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायल्याने गाणार्‍या साधिकांतील सकारात्मकता पुष्कळ प्रमाणात वाढणे

राष्ट्रीय गीताविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘वन्दे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा अविभाज्य घटक झाले होते; किंबहुना ‘वन्दे मातरम्’ खेरीज भारतीय स्वातंत्र्यलढा हा अपूर्णच म्हणावा लागेल. ‘वन्दे मातरम् !’ या २ शब्दांनी सहस्रो क्रांतीकारकांना प्रेरित केले. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याचा तो एक मूलमंत्रच झाला ! ‘वन्दे मातरम्’ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतका प्रेरक मंत्र होता की, मादाम कामा यांनी ‘वन्दे मातरम्’ या शब्दांना भारताच्या नियोजित राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी ठळकपणे स्थान दिले आणि तो राष्ट्रध्वज १९०७ मध्ये बर्लिन येथे फडकावला. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत आजही, म्हणजे ते रचल्यानंतर १५३ वर्षांनीही राष्ट्राभिमान्यांमध्ये जाज्वल्य राष्ट्रभक्ती, भारतभूमीविषयी असामान्य प्रेम निर्माण करण्यात सिंहाची भूमिका निभावते.

‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ११.८.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत २ साधिका सहभागी झाल्या होत्या. चाचणीतील पहिल्या साधिकेला आध्यात्मिक त्रास (टीप) आहे, तर दुसर्‍या साधिकेला आध्यात्मिक त्रास नाही. दोन्ही साधिकांनी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणण्यापूर्वी आणि म्हटल्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्याचा साधिकांवर झालेला परिणाम पुढे दिला आहे.

टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्याचा साधिकांवर सकारात्मक परिणाम होणे : ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर दोन्ही साधिकांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली किंवा तिच्यामध्ये वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून स्पष्ट होते.

२. निष्कर्ष

‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर दोन्ही साधिकांवर सकारात्मक परिणाम झाला.

सौ. मधुरा कर्वे

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेली साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका यांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होणे अन् त्यामागील कारणमीमांसा

३ अ १. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत संस्कृत भाषेमध्ये असल्याने, तसेच त्यात मातृभूमीला वंदन आणि तिची स्तुती असल्याने या गीतामध्ये शक्ती अन् चैतन्य असणे : संस्कृत ही विश्वातील सर्वाधिक सात्त्विक भाषा आहे. सात्त्विक भाषेतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. राष्ट्रभक्त बंकीमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत संस्कृत भाषेमध्ये असल्याने, तसेच त्यात मातृभूमीला वंदन आणि तिची स्तुती असल्याने त्यात शक्ती अन् चैतन्य आहे. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणतांना मातृभूमीविषयी प्रेम आणि आदर निर्माण होतो. त्यामुळे गाणार्‍यामध्ये राष्ट्राविषयीची अस्मिता वाढून राष्ट्रनिष्ठा प्रबळ होते.

चाचणीतील साधिकांनी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्यामुळे त्यांना गीतातील शक्ती आणि चैतन्य याचा लाभ झाला. त्यामुळे दोन्ही साधिकांना ‘त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे, त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे किंवा तिच्यामध्ये वाढ होणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.

‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हटल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.५.२०१९)

ई-मेल : [email protected]

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.