नागरिकांच्या तक्रारींकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !
नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे असंवेदनशील प्रशासन !

नागपूर, ९ जुलै – शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व आणि उत्तर नागपूर येथील खोलगट भाग, हिवरीनगर, श्रीकृष्णनगर, नंदनवन, तर काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांमुळे घरात पाणी शिरल्यामुळे घरांतील साहित्यांची हानी झाली आहे. पहिल्याच पावसात नागरिकांची दाणादाण उडून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उत्तर नागपूर येथील हुडको कॉलनी, बारा खोली, ‘एन्.आय.टी’ भागात जवळपास अडीच फूट पाणी साचलेले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवतांना कसरत करावी लागली. अनेक भागांत गटार वाहिनी नसल्याने प्रतिवर्षी समस्या उद्भवत आहेत, अशी माहिती नागरिकांनी दिली. याविषयी नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे प्रतिवर्षी कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने पावसाळ्यात या समस्यांना सामोरे जावे लागते, तसेच हानी होऊनही काहीच हानीभरपाई मिळत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. (तक्रारी करूनही नागरिकांच्या समस्या न सोडवणार्या संबंधित दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. पावसामुळे प्रतिवर्षी नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)
सरकारला ‘नीट’ प्रश्नपत्रिका बनवणार्या सर्व तज्ञांना अज्ञात ठिकाणी ठेवावे लागणे, हे तज्ञांना लज्जास्पद !
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपनाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा तीव्र विरोध !
पुणे येथे नदी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत ८ कोटी रुपये खर्च
पुणे रेल्वेस्थानकाचा ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सिद्ध ! – श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री
चिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे पावसाळापूर्व ‘मॉक ड्रिल’ : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता !