एका धर्मांधाला अटक
गोमाता आणि गोवंश यांचे रक्षण करणार्या पोलिसांचे अभिनंदन ! राज्यात गोवंशियांच्या कत्तलीच्या वारंवार होणार्या घटना रोखण्यासाठी पोलीस अन् प्रशासन यांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

मुंबई, २७ जून (वार्ता.) – नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील सोपारा गावातील वाझा मोहल्ला, हड्डी मैदान येथे अवैध वाहतूक रोखून पोलिसांनी कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या २५ गोवंशियांची सुटका केली. यामध्ये गोमाता आणि वासरे यांचा समावेश होता. पोलिसांनी ही कारवाई २४ जून या दिवशी सकाळी ११.४५ वाजता केली असून या प्रकरणी टेम्पोचालक सद्दाम महंमद रफिक शहा याला अटक करण्यात आली आहे.
या वेळी पोलिसांनी अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो कह्यात घेतला आहे. सुटका करण्यात आलेले गोधन आणि वाहन यांचे मूल्य १२ लाख ५९ सहस्र ९०० रुपये इतके आहे. कह्यात घेतलेल्या गोवंशियांना गोशाळेत पाठवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे आणि त्यांचे सहकारी यांनी केली.
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
‘नशामुक्त’ राज्य ?
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक