
सातारा, १२ जून (वार्ता.) – राज्या सरकारने पुन्हा एकदा पायी वारीवर बंधने घालून वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अनादर केला आहे. पंढरपूरमध्ये राजकीय मेळावे चालतात, तर मग पायी वारी का नको ? असा प्रश्न वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्रचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी केला आहे.
ह.भ.प भोसले महाराज पुढे म्हणाले, ‘‘मागील वर्षी कोरोना हा आजार माणसांना नवीन होता. तीव्रता अधिक होती. दळणवळण बंदी होती. तरीही पंढरपूरसारख्या ठिकाणी सहस्रोंच्या उपस्थितीमध्ये राजकीय मेळावे झाले. निवडणुकांच्या कालावधीत अनेक मंत्री, विरोधी पक्षांचे नेते पंढरपूरमध्ये ठाण मांडून बसले होते. तेव्हा कोरोना कुठे होता ? आता वारीच्या वेळीच पंढरपूरमध्ये पुन्हा कोरोना वाढणार आहे का ? वारकरी शिस्तीचे पालन करणार आहेत. शासनाने कठोर निर्बंध घालावेत; मात्र सोहळा पायीच होऊ द्यावा.’’
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)