
मुंबई – महाराष्ट्राला कोरोनावरील १ कोटी ६ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८८ लाख डोसचा उपयोग करण्यात आला आहे. डोस वाया जाण्याचे प्रमाण ३ टक्के आहे. ५ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ८१ लाख २१ सहस्र ३३२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात प्रतिदिन ४ लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे, अशी माहिती राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी दिली. ६ एप्रिल या दिवशी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोनावरील लसीकरणाचा आढावा घेतला. या वेळी डॉ. व्यास यांनी वरील माहिती दिली.
मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले, ‘‘भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरीपेक्षा अधिक लसीकरण केले आहे. संभाजीनगर, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि ठाणे या ६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. तेथे प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.’’
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)