देवीच्या चरणांवरील वस्त्र परिधान करण्यामागील लाभ कोणते ?

ओटी भरल्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र देवीचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळही प्रसाद म्हणून खावा. देवीचा प्रसाद म्हणून ते वस्त्र परिधान केल्याने देहाभोवती संरक्षककवच निर्माण होऊन देहाची शुद्धी होते. देवीप्रती आपला भाव जेवढा अधिक असेल, तेवढा अधिक काळ देवीकडून मिळालेली सात्त्विकता टिकते.

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘देवीपूजनाचे शास्त्र’)