हिंदूंनी बलप्राप्तीसाठी करावयाची प्रार्थना !
आमची त्याला केवळ एवढीच प्रार्थना आहे की, हे प्रभो, तू ओजस्वरूप आहेस, आम्हाला ओजस्वी कर; तू वीर्यस्वरूप आहेस, आम्हाला वीर्यवान कर; तू बलस्वरूप आहेस, आम्हाला बलवान कर.’ – स्वामी विवेकानंद
आमची त्याला केवळ एवढीच प्रार्थना आहे की, हे प्रभो, तू ओजस्वरूप आहेस, आम्हाला ओजस्वी कर; तू वीर्यस्वरूप आहेस, आम्हाला वीर्यवान कर; तू बलस्वरूप आहेस, आम्हाला बलवान कर.’ – स्वामी विवेकानंद
प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रह्म होय. बाह्य आणि अंतःप्रकृती यांचे नियमन करून स्वतःतील मूळचे ब्रह्मरूप प्रकट करणे, हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य होय !
असे झाल्यास जगातून समस्त आध्यात्मिकता नाहीशी होईल, सारी नैतिकता पूर्णतः नष्ट होईल, धर्माविषयीची सारी मधुर सहानुभूती संपूर्ण लोप पावेल आणि सर्व प्रकारचा उच्च आदर्शवाद अस्तंगत होऊन जाईल
भारतात आधी येथे आध्यात्मिक विचारांचा पूर वाहू द्या. ज्याकडे आपण प्रथम लक्ष द्यावयास हवे, असे जर कोणते कार्य असेल, तर ते हेच की, आपली उपनिषदे, पुराणे आणि धर्मशास्त्रे…
वेदांताची प्रकाशदायी, जीवनदायी तत्त्वे घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवामध्ये अव्यक्त असलेले ईश्वरत्व जागृत करा; मग तुम्हाला मिळालेल्या यशाचे प्रमाण अल्प असो वा अधिक असो, तुम्हाला हे समाधान लाभेल की, तुम्ही स्वतःचे जीवन एका महान आदर्शासाठी व्यतित केले
जगातील प्रायः प्रत्येक देशात मी भिन्न भिन्न प्रकारची जातीसंस्था पाहिली आहे; परंतु भारतात जातीसंस्थेची जी एक उत्कृष्ट व्यवस्था आहे आणि तिच्या मुळाशी जो एक उच्च उद्देश आहे, तसा इतरत्र कुठेही आढळत नाही.
‘‘भारताची माती माझा स्वर्ग आहे, भारताच्या कल्याणातच माझे कल्याण आहे.’’ रात्रंदिवस हीच प्रार्थना कर, ‘‘हे गौरीनाथ, हे जगदंबे, मला ‘मनुष्यत्व’ दे. माते, माझी दुर्बलता, भीरुता (भित्रेपणा) दूर कर. मला ‘मनुष्य’ बनव.’’
गोर्या कातडीचे लोक ज्या विचारांची, ज्या चालीरितींची प्रशंसा करतील किंवा त्यांना जे विचार आणि ज्या चालीरिती आवडतील, त्या चांगल्या आणि ज्या गोष्टींची ते निंदा करतील अथवा ज्या गोष्टी त्यांना आवडणार नाहीत त्या वाईट ! अरेरे, मूर्खपणाचा याहून प्रत्यक्ष पुरावा तो कोणता ?
आध्यात्मिकतेचा मनुष्यामध्ये जेवढा अधिक विकास होईल, तेवढा तो अधिक सामर्थ्यशाली बनेल आणि त्याचे हे सामर्थ्य शेवटपर्यंत टिकेल; म्हणून आधी आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा.
जिथे प्रामाणिक धारणा आणि विशुद्ध हेतू आहे, तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. या दोहोंनी संपन्न असलेले लोक थोडेसेच जरी असले, तरी ते सर्व प्रकारच्या अडचणींवर निश्चित मात करून विजयी होतील, यात शंका नाही.