भक्तांनी व्यवहारात वागतांना ठेवावयाचे विविध भाव

आपल्या आवडत्या देवतेला सर्वांच्यात पहावे आणि सर्वांशी आदराने वागावे.

भक्तीचे प्रकार

‘मी भगवंताचा दास आहे, म्हणजे ‘माझे’ म्हणून जे काही आहे, ते सर्व भगवंताचे आहे’, अशी वृत्ती बनली पाहिजे. दास होण्यामध्ये लाचारी नाही. दास म्हणजे ज्ञानाचे दास्य. त्यामध्ये तेज आणि आनंद आहे.

बालसत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मानस पाद्यपूजा करतांना ‘ते प्रत्येक बालसाधकासाठी वेगवेगळे रूप घेऊन आले आहेत’, असे अनुभवणारी कु. प्रार्थना पाठक (वय ११ वर्षे) !

मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात असल्याने मी बालसाधकांच्या सत्संगात ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.

आदर्श भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोपी !

आदर्श भक्ती म्हणजे ‘गोपींच्या भक्तीसारखी’ एवढीच उपमा दिली जाते; कारण भक्तीचे वर्णन होऊ शकत नाही. ती शब्दांकित होऊ शकत नाही; कारण ती अर्थांकित आहे; म्हणून ‘भक्ती कशी असावी, तर गोपींसारखी’, हे त्याचे उत्तर असते.

भक्ती म्हणजे काय ?

भगवंताची भक्ती करणे, म्हणजे सुख आणि भगवंताला विसरणे, म्हणजे दुःख. याची जाणीव साधना करणाऱ्या भक्ताला असल्यामुळे तो आर्ततेने सतत देवाला आळवत असतो.

सर्वश्रेष्ठ नवविधा भक्ती !

नवविधा भक्ती आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाते. यातील पहिले ३ प्रकार परमेश्वराप्रती श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी साहाय्यक ठरतात. पुढचे ३ हे भगवंताच्या सगुण रूपांशी संबंधित आहेत आणि शेवटचे तीन हे आंतरिक भाव आहेत. पहिल्या तिन्हीत नामाला विशेष महत्त्व आहे.

भावसूचना

भावजागृतीचे प्रयत्न करतांना प्रारंभी प्रत्येक कृतीला भाव जोडायचा आहे, हे सातत्याने लक्षात रहात नाही. यासाठी सूचना द्यायला हवी. रामनाथी आश्रमातील सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी सांगितलेली भावसूचना पुढे दिली आहे.

समष्टी भाव वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न !

प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करत आहे, तसेच ईश्वराचे कार्यही माझेच आहे, या प्रकारचा भाव आणि त्यातून ईश्वरेच्छेने घडणाऱ्या कृतीला ‘समष्टी भाव’ म्हणतात.

भगवंताचे भावपूर्ण अनुसंधान साधून देणारे नाम !

दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणाऱ्या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात् साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामयोग !

भावजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे का महत्त्वाचे ?

साधकाने लक्षात ठेवले पाहिजे की, आपण साधनेत कितीही पुढे गेलो, तरी आपल्याला मधून मधून भावस्थितीत रहाता आले पाहिजे. आपल्या मनात भाव असेल, तरच आपल्याला ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळणार आहे.