महायुद्धापासून रक्षण होण्यासाठी साधना आवश्यक !
‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण म्हणजेच ‘व्हॅक्सिनेशन’ करतो, तसेच तिसऱ्या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे.’
‘एखादा रोग होऊ नये; म्हणून लसीकरण म्हणजेच ‘व्हॅक्सिनेशन’ करतो, तसेच तिसऱ्या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना हीच लस आहे.’
‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पहाते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’
‘एखाद्याने एखादी वस्तू दिली, तर घेणाऱ्याला आनंद होतो. यापुढे गेल्यावर वस्तू देणाराच मिळाला, तर त्याला किती आनंद होईल ! ईश्वरच सर्व गोष्टी देणारा असल्याने त्याच्या प्राप्तीने सर्वाेच्च आनंद होतो !’
सनातन हिंदु धर्माला उत्पत्ती नसल्यामुळे, म्हणजे तो अनादि असल्यामुळे तो अनंत काळपर्यंत रहाणार आहे. हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे. जगात दुसरा धर्मच नसल्यामुळे ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द किती अयोग्य आहे, हेही यावरून लक्षात येते.’
‘जगात केवळ सर्व धर्मांचा अभ्यास न केलेले हिंदू ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात. बाकी एकाही धर्मातील एकही जण तसे म्हणत नाही. हिंदूंच्या हे लक्षात येत नाही की, ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा आहे, ‘प्रकाश आणि अंधार समान आहेत’, असे म्हणणे आहे !’
‘राजकीय क्षेत्रातील सर्वच कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पैसे मिळवण्यासाठी भारतीय अमेरिकेत जातात, तर ईश्वरप्राप्तीसाठी जगभराचे भारतात येतात ! यांतून हुशार कोण, हे तुम्हीच ठरवा !’
पाठ्यपुस्तकातून बाबर, अकबर, औरंगजेब आदी धर्मांध बादशाहांची क्रूर अत्याचारांची माहितीही इतिहासातून शिकवा, म्हणजे पुढच्या पिढ्या सावध रहातील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्माच्या संदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘शारीरिकदृष्ट्या विचार केला, तर वयोमानानुसार माझे विस्मृतीचे प्रमाण वाढत आहे; पण आध्यात्मिकदृष्ट्या मी नेहमी वर्तमानकाळात रहात असल्यामुळे मला भूतकाळातील काही आठवत नाही आणि भविष्यात स्थापन होणार्या हिंदु राष्ट्राचा विचारही माझ्या मनात येत नाही.’