साधना करण्याची अत्यावश्यकता !

साधना करण्याची अत्यावश्यकता !

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’

पृथ्वीवरील ‘ॐ’कारस्वरूप असलेला रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम !

पृथ्वीवरील ‘ॐ’कारस्वरूप असलेला रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम हा देवलोकासारखा आहे. आम्ही सप्तर्षी नेहमी या आश्रमाकडे ‘ॐ’कार आश्रम’ म्हणूनच बघतो. एक दिवस येणार, जेव्हा रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या खोलीवर आकाशात ‘ॐ’ दिसेल.’

विज्ञान हे कधी समजून घेईल ?

विज्ञान हे कधी समजून घेईल ?

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधनाविषयक अमृतवचने

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधनाविषयक अमृतवचने

‘गुरुदेवांनी आपल्याला शिकण्याच्या स्थितीत राहून आनंदी रहाण्याचा मार्ग शिकवला आहे. तो आपण सातत्याने आचरणात आणायला हवा !’

विज्ञानाची मर्यादा !

विज्ञानाची मर्यादा !

‘विज्ञानाने अध्यात्मातील सिद्धांतांविषयी काही सांगणे, म्हणजे बालकाने मोठ्यांविषयी काही सांगणे !’

विज्ञानाची निरर्थकता !

विज्ञानाची निरर्थकता !

मानवाला माणुसकी न शिकवणाऱ्या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणाऱ्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !

राष्ट्र आणि धर्मप्रेम

राष्ट्र आणि धर्मप्रेम

‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा. त्यात अधिक आनंद आहे !’

आश्रमजीवनाचा लाभ !

आश्रमजीवनाचा लाभ !

सनातनच्या आश्रमांमध्ये सर्वजण साधना करण्यासाठी ‘साधक’ या नात्याने रहात असल्यामुळे एका आश्रमात २००-२५० जण रहात असले, तरी कुणामध्येही भांडणे होत नाहीत. सर्वजण आनंदाने रहातात आणि एकमेकांना साहाय्य करतात.’

शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !

शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !

‘आपली शिकण्याची स्थिती अल्प असेल, तर साधनेच्या एका टप्प्यावर निरुत्साह येऊ शकतो. त्यामुळे साधकाने सतत शिकण्याच्या राहिले पाहिजे. सतत शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !’

वरवरचे उपाय योजणारे शासनकर्ते !

वरवरचे उपाय योजणारे शासनकर्ते !

‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना शासनकर्ते जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’