सामाजिक सलोखा ?

सामाजिक सलोखा ?

रामनवमीला देहली, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, बंगाल या राज्यांमध्ये मिरवणुकीच्या वेळी दगडफेक करण्यात आली. हिंदु युवक नागराजू याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. अशा वेळी सलोख्यासाठी सामाजिक स्तरावर राबवलेल्या या उपक्रमांचा ‘सामाजिक सलोखा’ राखण्याच्या दृष्टीने लाभ होतो का ? हा प्रश्न उघड गुपित आहे !

‘कूलिंग चार्जेस’च्या नावाखाली लूट !

‘कूलिंग चार्जेस’च्या नावाखाली लूट !

शीतपेये उत्पादकांनीही दुकानदारांना योग्य लाभ मिळण्यासाठी धोरण ठरवले पाहिजे. सरकारनेही ग्राहकांची होणारी ‘आर्थिक लूट’ थांबवण्यासाठी कायद्याची प्रभावी कार्यवाही केली पाहिजे.

अन्न परब्रह्म !

अन्न परब्रह्म !

अन्नाची नासाडी न करण्याचे संस्कार झाले, तर भविष्यात तेच त्यांच्या अंगवळणी पडल्याने अन्न वाचवण्यास साहाय्यभूत होईल. त्यामुळे असे धडे शिकवण्यासमवेत विद्यार्थ्यांना अन्नाकडे प्रसाद म्हणून पहाण्याची भावनाही निर्माण होण्यासाठी प्रार्थना, नामजप हेही जोडीला शिकवणे अत्यावश्यक आहे.

वाळू तस्करांवर चाप कधी ?

वाळू तस्करांवर चाप कधी ?

तस्करांना राजाश्रय मिळत असल्याने अधिकारी बोटचेपी भूमिका घेतात. त्यामुळेच तस्करांचे मनोबल वाढते. त्यातून आक्रमणाच्या घटना सतत घडत आहेत. आतापर्यंत प्रशासनाने वाळू तस्करांवर कठोर कारवाई केली असती, तर आज अवैधपणे वाळूचे उत्खनन करण्याचे धारिष्ट्य कुणी केले नसते, हे निश्चित !

जनता उपाशी, लोकप्रतिनिधी तुपाशी !

जनता उपाशी, लोकप्रतिनिधी तुपाशी !

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णालयात भरती झालेल्या सामान्य नागरिकांना अक्षरश: घर-दार विकून रुग्णालयांची देयके द्यावी लागत होती आणि दुसरीकडे मंत्री, नगरसेवक यांनी सरकारकडून देयके घेणे, हा एक प्रकारे सरकारी तिजोरीवर मारलेला डल्लाच आहे !

संस्कारांचे बाजारीकरण नको !

संस्कारांचे बाजारीकरण नको !

धर्मशिक्षण न दिल्याने विवाह संस्कारासारख्या सुंदर संस्कारांचे बाजारीकरण होऊन अनेकांचे जीवन, तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. हे बाजारीकरण थांबवण्यासाठी आणि संभाव्य तोटे लक्षात घेऊन सरकारने आतातरी मुलांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करावी.

कौटुंबिक छळ का ?

कौटुंबिक छळ का ?

‘राज्य महिला आयोगा’ने उपाययोजनांसमवेत धर्मशास्त्र समजून घेऊन महिलांसह संपूर्ण कुटुंबाला साधना करण्यास प्रवृत्त केल्यास खऱ्या अर्थाने समस्या सुटतील. यासाठी संबंधितांनीही साधना करून अनुभूती घेतल्यास याचे प्रबोधन चांगल्या प्रकारे होईल, हे निश्चित ! सरकारने यामध्ये लक्ष घालून हिंदूंना धर्मशिक्षण कसे मिळेल, याकडे लक्ष दिल्यास खरा विकास होईल.

इंग्रजीच्या बेडीत अडकलेली ‘मराठी’ !

इंग्रजीच्या बेडीत अडकलेली ‘मराठी’ !

साहित्य, पत्रकारिता, सामाजिक माध्यमे, प्रशासन, शासन या प्रत्येक ठिकाणी आणि सामान्य नागरिकही मराठी बोलतांना सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतांना आढळतात.

रेल्वेतील कुचकामी सुरक्षाव्यवस्था !

रेल्वेतील कुचकामी सुरक्षाव्यवस्था !

रात्रीच्या वेळी तरुण शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती का केली जात नाही ? तरुणांमध्ये असणारे धाडस आणि शारीरिक क्षमता तुलनेने वयस्करांमध्ये अल्प होत जाते, हे वरिष्ठांनी लक्षात घ्यायला हवे. ‘केवळ दाखवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती केली आहे’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार !

कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार !

कीर्तनकारांनी समाजात जागृती आणि प्रबोधन करून अध्यात्मप्रसार अन् प्रबोधन यांचे कार्य केले आहे. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार आहे. त्यामुळे कीर्तनकार सांगत असलेल्या कीर्तनाचा मतीतार्थ समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्यातच स्वहित आहे.