मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा !

आंध्रप्रदेशातील वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या सरकारने सरकारीकरण झालेल्या हिंदूंच्या २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेण्यासाठी त्या चिन्हांकित केल्या आहेत. या भूमींचे मूल्य १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.

उत्तरदायींना कारागृहात डांबा !

हत्‍या करण्‍यात आलेला कुख्‍यात गुंड अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ अहमद यांच्‍या समर्थनार्थ माजलगाव (जिल्‍हा बीड) येथील चौकात लावण्‍यात आलेल्‍या फलकांवर त्‍यांना ‘हुतात्‍मा’ म्‍हटले होते.

इस्‍लामी देशांतील हिंदूंची स्‍थिती जाणा !

पाकमध्‍ये वर्ष २०२१ च्‍या तुलनेत वर्ष २०२२ मध्‍ये हिंदूंच्‍या मंदिरांच्‍या तोडफोडीच्‍या घटना दुप्‍पट झाल्‍याचे पाकिस्‍तानच्‍या मानवाधिकार आयोगाच्‍या अहवालात दिसून आले आहे.

अशा खलिस्तान्यांवर कारवाई करा !

एका युवयुतीने चेहर्‍यावर भारताचा राष्ट्रध्वज रंगवल्याने सुवर्ण मंदिराबाहेरील अधिकारी तिला आत जाण्यापासून सू रोखत ‘हा पंजाब असतांना तुम्तुही भारताचा राष्ट्रध्वज कसा रंगवू शकता ?’, असा प्रश्न विचारल्याची घटना समोर आली आहे.

हरिद्वारचे वाढते इस्लामीकरण थांबवा !

हरिद्वार हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हरिद्वार जिल्ह्यातील मुसलमानांची लोकसंख्या प्रत्येक १० वर्षांनी ४० टक्क्यांनी वाढत आहे, असे वृत्त ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केले आहे.

यू ट्यूबचा हिंदुद्वेष जाणा !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांचे श्रीराम चॅनल तेलंगाणा हे यू ट्यूब चॅनल धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करत असल्याचे सांगत त्यावर यू ट्यूबकडून बंदी आणण्यात आली आहे.

काँग्रेस सरकारच्या निष्क्रीयतेमुळे झालेला उद्रेक जाणा !

बेमेतरा (छत्तीसगड) येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केल्यामुळे एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाला होता. आता येथे विश्व हिंदु परिषदेने लोकांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ दिल्याचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे.

झारखंडमधील हिंदुद्वेषी पोलीस आणि सरकार यांना ओळखा !

जमशेदपूर (झारखंड) येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या संदर्भात निवेदन सादर करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटायला गेलेल्या एका अधिवक्त्यासह ८ हिंदु कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

हनुमान जयंतीच्या दिवशी मिरा रोड (जिल्हा ठाणे) येथे मशिदीजवळून दुचाकीवरून जाणार्‍या काही हिंदूंनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुसलमानांच्या दबावामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून ५ दिवस कोठडीत ठेवले.

निधर्मीवादी यावर बोलतील का ?

भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का ? जगातील दुसर्‍या क्रमांकाची मुसलमानांची लोकसंख्या भारतात आहे, असे विधान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी अमेरिकेत केले.