पुणे येथील खडकवासला धरणातून मुठा नदीत १ सहस्र क्युसेक पाण्याचा विसर्ग !

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांपैकी एक असलेले खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे २५ जुलै या दिवशी सायंकाळी ५ वाजता मुठा नदीत १ सहस्र क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

१ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दिवसाचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. १ ऑगस्ट या दिवशी हा दौरा होणार असून या दौर्‍यात ते आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असून त्यानंतर ते लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला येणार आहेत.

कोयना धरणात ६० टी.एम्.सी.हून अधिक पाणीसाठा !

पाटण तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाचा जोर कायम असून धरणात प्रतिसेकंद सरासरी ६० सहस्र ३३८ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

‘ऑनलाईन गेम’चा जुगार !

‘ऑनलाईन गेम’वरील करवाढीने महसुलात तब्‍बल २० सहस्र कोटी रुपयांची भर पडणार आहे. जेव्‍हा एक हरतो, तेव्‍हाच दुसरा जिंकतो. यामध्‍ये हरणारे प्रसंगी आयुष्‍यातूनही उठणार आहेत; मात्र जुगारी आस्‍थापने आणि सरकार यांचा मात्र केवळ लाभच आहे. ‘हे कितपत नैतिक आहे ?’ याचा गांभीर्याने विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे.

तिवरे धरण क्षेत्रातील ३० कुटुंबियांचे पुनर्वसन न होण्यामागील अडचणी दूर करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिवरे धरणाचा विषय गंभीर आहे. आम्हाला मोठ्या धरणांची आवश्यकता नसून छोटे-छोटे पाझर तलाव व्हावेत, अशी आमची मागणी आहे. तिवरे धरण फुटून चार वर्षे लोटली, तरी धरण नव्याने बांधण्याला संमती मिळालेली नाही.

चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना रक्कम दिली जाणार नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंपदा विभागाची कामे करतांना कंत्राटदाराची टेंडर भरण्याची सक्षमता तपासली जावी, या अनुषंगाने स्वतंत्र शासननिर्णय निर्गमित करणे अथवा सध्याच्या शासननिर्णयात पालट करणे या दोन्ही पर्यायांचा विचार केला जाईल.

रत्नागिरी जिल्ह्यात दरडप्रवण भागांतील १ सहस्र ७०१ जणांचे स्थलांतर

जिल्ह्यात मागील १५ दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. पावसासमवेत वेगवान वार्‍यामुळे झाडे पडून घरा-गोठ्यांची हानीही झाली आहे. यंदा सर्वाधिक धोका भूस्खलनाचाच आहे.

लाभात असलेल्या बससेवा रत्नागिरी विभागाला चालवता येत नसतील, तर अन्य विभागांकडून चालवाव्यात !

दापोली-शिर्डी बससेवा ही बस निमआराम (सेमी) केल्यापासून पुणेपर्यंत चालवली जात आहे. दापोलीतून सुटणार्‍या परळी, शिर्डी, अक्कलकोट आणि विजापूर बससेवा बंद करण्याचा घाट !

(म्हणे) ‘गजमुख असलेला भगवान श्री गणेश ही केवळ एक दंतकथा !’-ए.एन्. शमसीर यांची गरळओक

भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे. असे असतांना राज्यघटनेने दिलेल्या एका महत्त्वाच्या पदावर राहून हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार शमसीर यांना कुणी दिला ?

(म्हणे) ‘पाकने भीक मागणे बंद करावे !’ – पाकचे सैन्यप्रमुख

पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे निघाले आहे. त्यामुळे पाकच्या सैन्यप्रमुखांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी तेथील परिस्थिती पालटणार नाही, हेही तितकेच खरे !