देवाचा शोध घेणे आवश्यक !
‘शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्वाचे कोडे उलगडते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्वाचे कोडे उलगडते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘स्वःच्या आई-वडिलांची, भावंडांची, सासू-सासर्यांची काळजी न घेणारे तरुण राष्ट्र आणि धर्म यांसाठी कधी काही करतील का ? हे आहे स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांतील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या प्रसारामुळे धर्माविषयी तरुण भ्रमित झाल्याचे फळ !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘शाळेत गणित, भूगोल, अर्थशास्त्र इत्यादी अनेक विषय शिकवतात. त्यांपैकी किती विषयांचा जीवनात १ टक्का तरी लाभ होतो ? असे आहे, तर विद्यार्थ्यांचा वेळ ते विषय शिकवण्याऐवजी समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय जगातील कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय होणे शक्य नाही. यासाठी हिंदूंनो, साधना करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवा आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध पालटणे जवळजवळ अशक्य असते. पालटायचेच झाले, तर तीव्र साधना करावी लागते. असे असतांना भारताचे प्रारब्ध शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर प्रयत्न केल्यास पालटणे शक्य आहे का ? त्याला आध्यात्मिक स्तराचेच उपाय, म्हणजे साधनेचे बळ हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भावी पिढी आतंकवादी निर्माण होऊ नये; म्हणून शाळेतील अभ्यासक्रमातच हिंदु धर्मात सांगितलेले ज्ञान, विज्ञान, तसेच चांगले संस्कार करणार्या गोष्टींची शिकवण दिल्यास मुलांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘रामायण, महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र नुसते वाचण्यापेक्षा त्यांतील घटनांकडून स्फूर्ती घेऊन सनातन धर्माचे रक्षण करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘डॉक्टर, वकील यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का? कसे?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर त्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्न निर्माण होतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे झाली, तरी अजूनही ‘इंग्रजी भाषेची गुलामगिरी नष्ट करावी’, असे एकाही शासनकर्त्याला वाटत नाही. भावी हिंदु राष्ट्रात तामसिक इंग्रजी भाषेचे नव्हे, तर सात्त्विक संस्कृत भाषा आणि अन्य भारतीय भाषा यांचे संवर्धन अन् प्रसार केला जाईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे प्राण्यांप्रमाणे स्वेच्छेने वागणारे, तर साधक म्हणजे परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागणारे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले