वास्तविक ‘दूरदर्शीपणा’ !
‘स्वसुखासाठी दुसर्यांना दुःख देऊन धनाचा संग्रह करणे, हे पाप आहे; पण भविष्यकाळ लक्षात घेऊन त्यासाठी आपली उचित अशी तयारी योग्य प्रकारे करून ठेवणे याला ‘दूरदर्शीपणा’ म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘स्वसुखासाठी दुसर्यांना दुःख देऊन धनाचा संग्रह करणे, हे पाप आहे; पण भविष्यकाळ लक्षात घेऊन त्यासाठी आपली उचित अशी तयारी योग्य प्रकारे करून ठेवणे याला ‘दूरदर्शीपणा’ म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कुठे ʻविश्वचि माझे घर’, असा भाव असलेले संत, तर कुठे बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदूही आपले न वाटणारे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पाकिस्तान्यांकडून वारंवार आक्रमणे होत असतांना ‘आक्रमण करणे’ हेच स्वरक्षणाचे सर्वोत्तम साधन आहे (Attack is the best policy of defence), हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकाही सरकारला ज्ञात नाही; म्हणून भारत आणि हिंदूही नेहमी शत्रूंकडून मार खातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
विज्ञान निरनिराळे ग्रह-तारे यांचा आकार, पृथ्वीपासूनचे अंतर इत्यादी माहिती सांगते, तर ज्योतिषशास्त्र ग्रह-तारे यांचा परिणाम आणि परिणाम वाईट होणार असल्यास त्यांवरील उपायही सांगते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
विज्ञान वनस्पतींची केवळ भौतिक माहिती सांगते. याउलट कोणत्या देवतेला कोणते पान, फूल, वाहावे इत्यादी माहितीही अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
विज्ञान प्राण्यांच्या स्थूलदेहाची माहिती सांगते. याउलट कोणत्या प्राण्यांत कोणत्या देवतेचे तत्त्व आहे इत्यादी माहिती अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वास्तूचे व्यक्तीवर रात्रंदिवस परिणाम होतात. हे ज्ञात नसल्यामुळे आधुनिक वास्तूशास्त्रज्ञ केवळ हवा, उजेड आणि दिसायला वास्तू कशी दिसेल, यांचाच विचार करतात. याउलट धर्मात वास्तू कशी असली की, तिच्यामुळे त्रास होणार नाही, उलट तिच्यामुळे साधना करण्यास पूरक वातावरण मिळेल, याचा विचार केलेला असतो.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अध्यात्मात प्रगती केलेल्यांना व्यक्तीला केवळ पाहून तिने गुन्हा केला कि नाही, हे कळते. याउलट पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ते कळत नसल्यामुळे कोट्यवधी दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
एकच विकार झालेल्या सर्वच रुग्णांवर उपाय करतांना डॉक्टर फक्त ‘आजार काय आहे ?’, हे लक्षात घेऊन त्यानुसार सर्वांना सारखीच औषधे देतात. याउलट वैद्य रुग्णाच्या आजारासोबत त्याच्या प्रकृतीत वात-पित्त-कफ यांपैकी कोणता दोष प्रबळ आहे, हेही लक्षात घेऊन औषधे देतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कुठे परधर्मियांवर कुरघोडी करून त्यांच्यावर राज्य करण्याची शिकवण देणारे काही पंथ, तर कुठे ‘सर्वेषाम् अविरोधेण् ।’, अशासारखी सहिष्णुतावादी शिकवण देणारा महान हिंदु धर्म !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले