बलीदानदिनानिमित्त राजगुरुनगर (पुणे) येथे झळकले क्रांतीकारकांच्या देशभक्तीचे फलक !

हुतात्मा स्मारक, भीमा नदीतीरावरील राजगुरु वाड्यावर अभिवादन कार्यक्रम झाला. येथे सकाळी १० वाजता ध्वजारोहण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संध्याकाळी बजरंग दलाच्या वतीने शहरातून प्रतिवर्षीप्रमाणे भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली.

नागपूर येथे मांजराच्या चाव्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

येथील हिंगणा तालुक्यातील उखळी गावात रात्री ११ वर्षांच्या मुलाचा मांजराने चावा घेतला. यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. श्रेयांशु कृष्णा पेंदाम असे मृत मुलाचे नाव आहे.

खोट्या आरोपाखाली घरातील सर्वांना कारागृहात पाठवून १६ लाख ७६ सहस्र रुपयांची चोरी !

महिलेच्या विनयभंगाच्या खोट्या आरोपाखाली घरातील सर्वांना कारागृहात पाठवून चोरट्यांनी घरात शिरून चोरी केली आणि १६ लाख ७६ सहस्र रुपयांचा माल चोरला. अरुणकुमार श्यामानंद त्रिपाठी यांनी तक्रार दिली.

कीर्तनकारांनी सांप्रदायिक, सामाजिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे ! – ह.भ.प. नरहरी महाराज, सचिव, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

हिंदु जनजागृती समिती समवेत मी गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. अनेक मोहिमा वारकरी संप्रदाय आणि समितीने एकत्रितपणे राबवल्या अन् त्या यशस्वी झाल्या आहेत, असे मत महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज यांनी व्यक्त केले.

सातारा वाहतूक नियंत्रण शाखेने दीड लाख रुपयांच्या सायलेन्सर आणि हॉर्नवर फिरवला बुलडोझर !

येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गत आठवड्यात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या वेळी दीड लाख रुपयांचे सायलेन्सर आणि हॉर्न शासनाधिन करण्यात आले होते. या साहित्यावर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने बुलडोझर फिरवला आहे.

सरकारच्या ‘कोकण विकास महामंडळा’ची दुरवस्था : गुंतवणूक केलेली सर्व आस्थापने बंद !

कोकणाच्या विकासाकरता विविध आस्थापनांनी या महामंडळाशी गुंतवणूक करून चालू केलेले जवळजवळ सर्व प्रकल्प निष्क्रीय आहेत, तर काही प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

व्हॉट्सॲप गटातील राजकीय पोस्ट काढून टाकल्याच्या प्रकरणी पुणे विद्यापिठातील विद्यार्थ्याला मारहाण !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात शिकणार्‍या अनिल फुंदे या विद्यार्थ्याला व्हॉट्सॲप गटात पाठवलेली राजकीय पोस्ट काढून टाकल्याच्या प्रकरणी अनिल फुंदे यांस लाथा-बुक्क्याने आणि आसंदी यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली.

खच्चून भरलेल्या प्रवाशांमुळे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये शेकडो प्रवाशांना चढताच आले नाही !

प्रवासी संघटनांनी होळीनिमित्त होणार्‍या गर्दीची पूर्वकल्पना देऊनही रेल्वे प्रशासनाने मुंबईतून चिपळूण आणि रत्नागिरी येथे जाण्यासाठी एकही विशेष गाडी सोडली नाही. परिणामी दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये दिवा आणि पनवेल स्थानकांतील शेकडो प्रवाशांना गर्दीमुळे चढता आले नाही.

जिल्ह्यातून १ अपक्ष उमेदवार उभा करण्याचे मराठ्यांना आवाहन !

मी राजकारणात जाणार नाही. निवडणुकीला उभा रहाणार नाही; पण मराठा मतपेढी काय आहे, ती ताकद दाखवून देईन.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तूट !

विद्यापिठाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सादर केला. या वेळी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.