विवाह समारंभ, मंगल कार्यांसाठी ५० जणांचीच मर्यादा ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी
उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना आणि कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई
उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना आणि कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई
उपविभागीय दंडाधिकारी यांनी ज्या ठिकाणी धार्मिक विधी होणार आहे, त्या ठिकाणचे पर्यवेक्षण करून नियंत्रण ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.
गोगोई यांनी आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सिद्धता करण्यासह काही सूत्रांवर कठोर निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काही कट शिजला असावा, या गुप्तवार्ता विभागाच्या संचालकांच्या पत्राचा न्यायालयाने या वेळी उल्लेख केला.
येथील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे महानगरपालिकेने १८ फेब्रुवारीपासून शहराच्या हद्दीत प्रवासांवरील निर्बंध वाढवले आहेत. पुणे महानगरपालिकेने केरळमधून पुण्यात येणार्या सर्व प्रवाशांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या इमारती सील करण्याची सूचना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
तसेच १ मार्चपासून चालू होणारे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वीज देयकाच्या प्रश्नांसह अनेक सूत्रांच्या अनुषंगाने वादळी ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
विज्ञानाद्वारे यान पाठवून अन्य ग्रहांवर जीवसृष्टी होती का ? किंवा आहे का ? याचा शोध घेतला जात आहे; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्रानुसार ‘अनेक ब्रह्मांड असून त्यात जीवसृष्टी आहे’, असे सांगितले आहे आणि ऋषी, मुनी, संत, महात्मे यांनी त्याचा अनुभवही घेतला आहे आणि घेत आहेत.
यामुळे ४ दिवसांच्या कामकाजात कुणाला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याची लक्षणे ३ दिवसांच्या सुट्टीच्या कालावधीत दिसून येतील. त्यानंतर पुढच्या आठवड्यात चाचणी केल्यास कुणाला कोरोनाची लागण झाली असल्यास स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने सुचवले आहे.
जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे आणि हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित अन् व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्व भारती विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभामध्ये म्हटले.
जिल्ह्यात २४ घंट्यांत ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर ६४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. या धोकादायक काळातही नागरिकांनी नियम न पाळल्यास जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात येईल, अशी चेतावणी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे दिली आहे.