खातेवाटप लवकरच स्‍पष्‍ट होणार !- उदय सामंत, मंत्री

१७ जुलै या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्‍तार होऊ शकतो, असे शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी म्‍हटले आहे, तसेच पूर्वी २-३ दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्‍तार होऊ शकतो, असे भरत गोगावले यांनी म्‍हटले होते.

रेल्‍वेत बाँबस्‍फोट करण्‍याच्‍या संशयास्‍पद संदेशानंतर महाराष्‍ट्रातील रेल्‍वेस्‍थानकांवर सतर्कतेची चेतावणी !

मुंबई पोलिसांना ७ जुलै या दिवशी रेल्‍वेत बाँबस्‍फोट घडवण्‍याविषयी संशयास्‍पद संपर्क आल्‍यानंतर राज्‍यभरातील रेल्‍वेस्‍थानकांवर सतर्कतेची चेतावणी देण्‍यात आली आहे.

परतीच्‍या प्रवासात माऊलींच्‍या पादुकांना नीरा स्नान !

सकाळी ९.३० वाजता पालखी सोहळा उत्‍साहात नीरा नगरीत दाखल झाला आणि येथील विठ्ठल मंदिरात विसावला. माऊलींच्‍या पादुका रथातून विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्‍यात आल्‍या होत्‍या.

राज्‍यातील राजकीय घडामोडींवर पुणेकरांचा ‘एक सही संतापाची’ मोहिमेस प्रचंड प्रतिसाद !

मागील काही मासांमध्‍ये देश आणि राज्‍यात चुकीच्‍या पद्धतीने राजकारण चालू आहे. आपण आज एकाला मतदान केले; पण ४ वर्षांत कोण कोणासह गेले ? हे समजत नसून या राजकीय लोकांनी लोकशाहीची थट्टा केल्‍याचे यातून दिसून येत आहे……

धर्माचे रक्षण, धर्माचरण या कृती आपल्‍या घरापासूनच कराव्‍या लागतील ! – अधिवक्‍ता अभिषेक भगत

महोत्‍सवाच्‍या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्‍यात आले. या वेळी स्‍वसंरक्षण प्रात्‍यक्षिके दाखवण्‍यात आली. शेवटी सर्वांनी हिंदु राष्‍ट्र स्‍थापण्‍याच्‍या कार्यात सहभागी होण्‍याची शपथ घेतली.

पिंपरी (पुणे) येथे धर्मांध शिंप्‍याचे १० वर्षीय मुलीसोबत अश्‍लील चाळे !

अल्‍पवयीन मुलींवरील अत्‍याचाराच्‍या वाढत्‍या घटना पहाता कायदा आणि सुव्‍यवस्‍था सक्षम करण्‍यासह अशा धर्मांध विकृतांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्‍हापूरकडून आरोग्‍य शिबिर !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ९ जुलैला ७५ वा स्‍थापना दिवस देशभरात मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. या अमृत महोत्‍सवी वर्षाच्‍या निमित्ताने कोल्‍हापूर शहरातील कावळा नाका सेवा वस्‍तीत आरोग्‍य शिबिर घेण्‍यात आले.

औरंगाबाद नावात तूर्तास कोणताही पालट न करण्‍याचे जिल्‍हाधिकार्‍यांचे आदेश !

जिल्‍ह्याच्‍या नामांतराच्‍या सूत्रावरून जिल्‍हाधिकारी यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी तूर्तास औरंगाबाद विभाग, जिल्‍हा, उपविभाग, तालुका आणि गाव यांच्‍या नावात कोणताही पालट करू नये, असे आदेश येथील जिल्‍हाधिकारी आस्‍तिककुमार पाण्‍डेय यांनी ४ जुलै २०२३ या दिवशी दिले आहेत.

मुंबईतील २ पर्यटकांचा लोणावळ्‍यात बुडून मृत्‍यू, एकाला वाचवण्‍यात यश !

सध्‍या पावसाळा चालू असल्‍याने लोणावळा आणि परिसरात वर्षाविहाराचा आनंद घेण्‍यासाठी ठिकठिकाणी पर्यटक येत आहेत. येथील वरसोली गावामध्‍ये वर्षाविहारासाठी मुंबईतील ३ पर्यटक आले होते.

पुणे येथे ‘ऑनलाईन रमी’ मध्‍ये हरल्‍याने तरुणाची नैराश्‍यातून आत्‍महत्‍या !

प्रलोभनांना बळी न पडण्‍यासाठी धर्मशिक्षणाची आवश्‍यकता आहे ! मनुष्‍य साधना करत असेल, तर तो संयमी, नीतीमान होतो. त्‍यामुळे तो अशा प्रलोभनांना बळी पडत नाही !