पुणे येथील सौ. शेफाली वैद्य या ‘जनसंवाद’ या (पत्रकारितेच्या, तसेच सामाजिक) क्षेत्रातील पदवीधर (मास डिग्री इन मास कम्युनिकेशन) आहेत. त्या लेखन आणि वक्तृत्व यांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात भारतीय कला, मंदिरे अन् त्यांची संस्कृती, परंपरा, भारतीय वस्त्र संस्कृती, तसेच अर्बन (शहरी) नक्षलवाद, हिंदुत्व यांविषयी जनजागृतीचे कार्य करत आहेत. आज आपण त्यांच्या कार्याविषयीचा परिचय त्यांच्याच शब्दांत करून घेणार आहोत.

विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. मुले आणि पालक यांच्यातील नातेसंबंध

अ. सध्याच्या आधुनिक युगात मुलांना नैतिक मूल्यांची जाणीव करून द्यायला पालकांना कमीपणा वाटतो. आपल्या पाल्याने सर्वांसमोर काही चूक केली, तर पालक त्या चुकीची जाणीव सर्वांसमोर करून द्यायला कचरतात. अशा वेळी स्पष्टवक्तेपणाने ती जाणीव कशी करून द्यायला हवी ? याची उदाहरणे पालकांनी स्वतःच्या कृतीमधून पाल्यांना कशी करून द्यावी, याविषयी सौ. शेफाली वैद्य यांनी ‘घार हिंडते आकाशी’ या त्यांच्या पुस्तकामध्ये करून दिली आहेत. त्यामध्ये स्वतःच्या ‘तिळ्यांना’ मोठे करतांना किंवा त्यांना घडवतांना त्यांनी ‘शिवचरित्र’, ‘रामायण’, ‘महाभारत’ या धर्मग्रंथांचा आधार कसा घेतला, हे समजावून सांगितले आहे.
न्यायालय, क्लब या ठिकाणी वस्त्रसंहिता हवी; मग मंदिरातच का नको ?
(टीप : वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
न्यायालयात, कामावर, तसेच क्लबमध्ये अशा सर्वच क्षेत्रांमध्ये वस्त्रसंहिता लागू आहे, तर मग मंदिरामध्ये विश्वस्तांनी वस्त्रसंहिता लागू केल्यास त्याला ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घातला जातो’, असे म्हणून विरोध का केला जातो ? इतर ठिकाणी वस्त्रसंहितेला विरोध होत नाही. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू केल्यास मंदिरांची सात्त्विकता टिकून रहाण्यास साहाय्य होईल. त्यामुळे हा उपक्रम सर्वत्रच राबवला पाहिजे.
– सौ. शेफाली वैद्य, लेखिका
२. मंदिरे आणि त्यांच्याशी निगडित संस्कृती अन् परंपरा
अ. सौ. शेफाली वैद्य या देश-विदेशात भ्रमण करत असतात आणि तेथील मंदिरे, शहरे, त्यांच्या वास्तूरचना यांचा अभ्यास करून वाचकांसमोर मांडत असतात.
आ. केवळ चंगळवाद किंवा मौजमजेसाठी भ्रमंती न करता ती अभ्यासपूर्ण कशी असावी ?, मंदिरांच्या वास्तूरचनेमागील शास्त्र, पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आणि त्यांचे महत्त्व इत्यादींविषयी त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून विपुलपणे मांडले आहे. गोमंतक भूमी ही पब, मदिरा, जुगार यांसाठी प्रसिद्ध होत असतांना त्यांनी तेथील स्थानिक पुरातन मंदिरांचे महत्त्व अनेकांपर्यंत पोचवले आणि त्यातून ‘गोव्या’कडे विशेषतः भ्रमंतीकडे पहाण्याचा अनेकांचा दृष्टीकोन पालटला.
३. ‘नो बिंदी नो बिझनेस’ मोहीम
(टीप : विज्ञापनातील मुलीने कुंकू वा टिकली लावलेली नसल्यास त्या आस्थापनाशी व्यवहार / खरेदी-विक्री न करणे)

सध्याच्या अनेक विज्ञापनांमध्ये मॉडेलच्या (विज्ञापनांमध्ये दाखवण्यात येणार्या महिला किंवा मुली) कपाळावर कुंकू नाही, हिंदु सणानुसार श्रृंगार नाही, म्हणजे एकप्रकारे उत्सवाचे चैतन्य त्यामधून झळकत नव्हते. त्या मॉडेलकडे पाहून उदासीनता, नैराश्य वाटायचे.
मी हिंदू आहे, मी फतवा काढत नाही, माझ्या पुरतं बोलते | Shefali Vaidya | (सौजन्य : News Danka) |
अशा वेळेला हे रोखण्यासाठी त्यांनी सामाजिक माध्यमातून ‘नो बिंदी नो बिझनेस’ हा ‘ट्रेंड’ (#NoBindiNoBusiness एक प्रकारची मोहीम) चालू केला आणि त्याला नेटकर्यांचा (इंटरनेट वापरकर्ते) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचा इतका सकारात्मक परिणाम झाला की, मोठमोठ्या आस्थापनांनी त्यांच्या उत्पादनांचे विज्ञापन करणार्या मॉडेल्सच्या कपाळावर टिकली लावायला प्रारंभ केला आणि त्यांना अधिक सात्त्विक पद्धतीने दाखवायला प्रारंभ केले.
४. सौ. शेफाली वैद्य यांच्या विचारांची जडणघडण ‘गोवा इन्क्विझिशन’ (धर्मच्छळ)च्या माध्यमातून !

मूळच्या गोवा येथील असणार्या सौ. शेफाली वैद्य यांच्या ३ पिढ्यांनी ‘गोवा इन्क्विझिशन’ची झळ अनुभवली आहे आणि त्यातूनच त्या ‘हिंदु’ म्हणून खंबीरपणे समोर आल्या. त्यातून त्यांच्या विचारांची जडणघडण झाली. गोव्याने मानवजातीच्या इतिहासातील सर्वांत क्रूर नरसंहार पाहिला आहे, तो म्हणजे गोव्याचे इन्क्विझिशन !
Goa Inquisition: The untold Atrocities by St. Xavier & Missionaries |
स्पॅनिश इन्क्विझिशनविषयी जगाला माहिती असतांना गोवा इन्क्विझिशनविषयी फारसे काही ठाऊक नाही. बर्बर पोर्तुगिजांच्या ४५१ वर्षांच्या जुलमी शासनानंतर ते उलथवण्यात आले आणि १९ डिसेंबर १९६१ या दिवशी गोवा मुक्त झाला, जो आज ‘गोवा मुक्ती दिन’ म्हणून ओळखला जातो. गोवा इन्क्विझिशन हे पोर्तुगीज कॅथोलिक चर्चने राबवलेली सर्वांत हिंसक इन्क्विझिशन म्हणून ओळखले जाते.
Goa Inquisition : Lest We Forget | Shefali Vaidya | #SangamTalks |
२५२ वर्षे (१५६० ते १८१२) सहन केलेल्या गोव्यातील हिंदूंनी सर्वांत भयंकर आणि रक्तरंजित इन्क्विझिशनचा सामना केला होता. त्यामध्ये हिंदूंच्या मंदिरांची किती हानी झाली, तसेच गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली, याविषयीचा इतिहास सौ. शेफाली वैद्य या लोकांसमोर ठेवत असतात अन् त्याविषयी जनजागृती करत असतात.
५. ‘शहरी नक्षलवाद’ आणि ‘हिंदुत्व’ यांवर परखडपणा
सौ. शेफाली वैद्य या शहरी नक्षलवादाचे भयावह वास्तव आणि त्यांचे साम्यवादी विचारसरणीच्या लोकांशी असलेले संबंध यांविषयी विविध व्याख्याने, तसेच मुलाखती यांच्या माध्यमातून प्रबोधन करत असतात. एखाद्या पुरो(अधो) गाम्याने ‘हिंदुत्वा’वर टीका केली, तर त्याला अभ्यासपूर्ण उत्तर देण्याचे कार्य त्या खंबीरपणे पार पाडत आहेत. जेव्हा त्या एखाद्या वृत्तवाहिनीवर हिंदु धर्मावरील टिकांचे खंडण करतात किंवा समाजात जाऊन विषय मांडतात, तेव्हा त्या एखाद्या ‘रणरागिणी’ प्रमाणे कडाडतात. त्यामुळे त्या अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या प्रेरणा ठरल्या आहेत.
६. अन्य कार्य
अ. नुकताच त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी हिंदुत्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना ‘अक्षय्य हिंदू पुरस्कार’ देण्याचा उपक्रम गेल्या २ वर्षांपासून चालू केला आहे.
#AkshayyaHinduAward – The Process
Last year, some of us like-minded individuals got together in Pune and decided to institute awards for the Hindus, by the Hindus for work done for the Hindus, the #AkshayyaHinduPuraskar!
The awards are given in five different categories, to…
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) April 7, 2024
आ. त्यांचे ‘फेसबुक’ या सामाजिक माध्यमावर १ लाख ७९ सहस्र इतके ‘फॉलोवर्स’ (अनुयायी) आहेत. त्याद्वारे त्या समाजात घडणार्या महत्त्वपूर्ण घटनांवरही भाष्य करतात. त्यांनी मराठी, इंग्रजी आणि कोकणी भाषांमध्ये लिखाण केले आहे.
इ. अनेक आघाडीच्या वृत्तवाहिन्यांमधून त्या हिंदुत्वाची बाजू ठामपणे मांडत असतात.