विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !

मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ पैकी ५ जागांवर महायुतीचे उमेदवार विनाविरोध निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रत्येकी २, तर भाजपचे १ उमेदवार विजयी झाले.

    रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विजयी झाले. पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे, अहिल्यानगर येथे भाजपचे प्राजक्त तनपुरे, ठाणे येथे शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळ येथे शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी हे सर्व बिनविरोध विजयी झाले आहेत. उर्वरित १२ जागांसाठी १८ जून या दिवशी निवडणूक होणार आहे.