
कोल्हापूर, ८ मार्च (वार्ता.) – कोणत्याही महापुरुषांची नावे ही गौरवानेच घेतली गेली पाहिजेत. कोल्हापूर येथील विद्यापिठाच्या नावात जर केवळ ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख असेल, तर त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव होत नाही. त्यामुळे ‘शिवाजी विद्यापिठाचा’ नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा झालाच पाहिजे. जे राज्यकर्ते आज सत्तेत सहभागी आहेत, त्या राज्यकर्त्यांनी स्वत:हून हा पालट करणे अपेक्षित आहे. खरेतर यासाठी आंदोलनाची आवश्यकताच नाही, असे मत योगऋषी स्वामी रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘शिवाजी’ विद्यापिठाच्या नामविस्तारासाठी मोठे आंदोलन उभे राहिले असून त्यासाठी १७ मार्चला मोर्चा होणार आहे. त्या संदर्भात त्यांचे मत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी