संपादकीय : महिलांनो, नवचंडी-दुर्गा बना !

मध्‍यप्रदेशच्‍या माजी मंत्री उषा ठाकूर

नवरात्रोत्‍सवाच्‍या काळात गरब्‍यात सहभागी होण्‍यासाठी ओळखपत्र अनिवार्य असायला हवे, अशी स्‍तुत्‍य मागणी मध्‍यप्रदेशच्‍या माजी मंत्री उषा ठाकूर यांनी केली आहे. ‘या संदर्भात गेली २० वर्षे जागृतीची मोहीम चालू असून तुम्‍ही (मुसलमान) तुमची ओळख लपवून ‘लव्‍ह जिहाद’ करू शकत नाही. या संदर्भात मुख्‍यमंत्री मोहन यादव यांची भेट घेऊन याविषयी चर्चा करणार आहे’, असेही त्‍यांनी या प्रसंगी सांगितले. नवरात्रोत्‍सव हा हिंदूंसाठी-महिलांसाठी शक्‍तीची उपासना करण्‍याचा काळ ! विशेषत्‍वाने अलीकडच्‍या काळात याचे स्‍वरूप पालटले असून देश पातळीवर जागोजागी दांडिया आणि तत्‍सम नृत्‍यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. या उत्‍सवांमध्‍ये मुसलमान तरुणांकडून हिंदु युवतींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढण्‍याचे प्रमाण लक्षणीयरित्‍या वाढले आहे. पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र यांसह प्रत्‍येक शासकीय कागदपत्र आता बनावट मिळवण्‍याचे आणि हिंदु नाव धारण करण्‍याचे तंत्र मुसलमानांनी अवगत केले आहे. यामुळे वस्‍तुत: त्‍या ओळखपत्रावर जरी हिंदु नाव असले, तरी अनेक वेळा मुसलमान युवकच नाव पालटून गरब्‍याच्‍या कार्यक्रमात समाविष्‍ट होत असल्‍याचे समोर आले आहे. हिंदु तरुणींची फसवणूक टाळण्‍यासाठी गरब्‍याच्‍या कार्यक्रमात येणार्‍या प्रत्‍येक तरुणाची स्‍थानिक स्‍तरावर ओळख पटवून त्‍याला स्‍थानिक मंडळांनी स्‍वतंत्र ओळखपत्र देणे अत्‍यावश्‍यक आहे. असे झाले, तरच धर्मांधांवर काही प्रमाणात वचक बसण्‍यास साहाय्‍य होईल.

मुसलमानांचा कावेबाजपणा !

मुसलमानांचा कावेबाजपणा आता इतका वाढला आहे की, त्‍यांच्‍याकडून थेट गरबा शिकवण्‍याची विज्ञापने सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित केली जात आहेत. महाराष्‍ट्रातील संभाजीनगर येथे असलम खान या व्‍यक्‍तीच्‍या नावावरून हे विज्ञापन प्रसिद्ध करण्‍यात आले असून ‘सेट अप डान्‍स अ‍ॅकॅडमी’, असे त्‍याचे नाव आहे. इतके दिवस केवळ मुसलमान युवक गरब्‍यासारख्‍या कार्यक्रमात जाऊन हिंदु युवतींना जाळ्‍यात ओढत असत. आता तर त्‍याही पुढे जाऊन मुसलमानच गरबा शिकवण्‍याचे वर्ग घेण्‍याचे नाटक करत आहेत. गरबा शिकण्‍याच्‍या नावाखाली हिंदु युवती इथे येणार आणि चालकच मुसलमान असल्‍याने मुसलमान युवकांना मुक्‍तपणे प्रवेश मिळणार अन् त्‍यातून हिंदु युवतींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात ओढणे सहज शक्‍य होणार आहे. अशा प्रकारे मुसलमानांकडून चालवण्‍यात येणारी नृत्‍य केंद्रे म्‍हणजे लव्‍ह जिहादी कारवायांचा अड्डाच बनणार आहेत, हे निश्‍चित ! कोणत्‍याही ‘डान्‍स अ‍ॅकॅडमी’मध्‍ये स्‍वत:च्‍या मुलीला गरबा शिकायला पाठवतांना ‘त्‍यांचे मालक-चालक कोण आहेत ?’, हे पडताळून पहाणे अत्‍यावश्‍यक आहे. कुणावरही आंधळेपणाने विश्‍वास न ठेवता अत्‍यंत सतर्क राहूनच हिंदूंना यापुढील काळात पावले उचलावी लागतील !

बांगलादेश आणि म्‍यानमार येथून येऊन भारतात अवैधरितीने रहाणार्‍या घुसखोरांनी मेलेल्‍या लोकांच्‍या नावावर खोटे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड बनवल्‍याचे समोर आले आहे. इतकेच नाही, तर याच खोट्या ओळखीच्‍या आधारे ते अधिकोषांमध्‍ये खाते उघडून त्‍याद्वारे व्‍यवहार करत आहेत. राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेला याचे पुरावे मिळाले असून त्‍यांना साहाय्‍य करणारे मोठे ‘रॅकेट’ देशभरात सक्रीय आहे. तमिळनाडू, हरियाणा, आसाम, बंगाल, काश्‍मीर यांसह अनेक राज्‍यांमध्‍ये हे ‘रॅकेट’ पसरले असून केवळ गरबा प्रवेशच नव्‍हे, तर हिंदूंनी त्‍यांच्‍या कोणत्‍याही व्‍यवसायासाठी कुणावरही विश्‍वास न ठेवता पूर्ण निश्‍चिती केल्‍यावरच संबंधितांना कामावर ठेवावे. अन्‍यथा पुष्‍कळ मोठी हानी झाल्‍यावर दु:ख करूनही काही लाभ होणार नाही.

हिंदु समाजाने सामूहिक उपासना करावी !

शालीनता हा हिंदु संस्‍कृतीचा एक प्रमुख घटक आहे. जेव्‍हा एखाद्या महिलेला आपण देवीच्‍या रूपात पहातो, तेव्‍हा आपोआपच वासनेचा क्षय होतो; मात्र असे होण्‍यासाठी त्‍या महिलेनेही धर्माचरण करणे तितकेच आवश्‍यक असते. पूर्वी महिला-युवतींना हे धर्मशिक्षण घरोघरी दिले जायचे. नवरात्रात देवीच्‍या शक्‍तीच्‍या रूपाची उपासना केली जाते. सध्‍या काळ पाहिला असता जागोजागी धर्मांध आक्रमक होत असून ते थेट हिंदूंवर आक्रमण करत आहेत. काही दिवसांनी येणार्‍या नवरात्रोत्‍सवाच्‍या निमित्ताने हिंदूंनीही सामूहिक स्‍तरावर देवीच्‍या शक्‍तीच्‍या रूपाची उपासना करून स्‍वसंरक्षण आणि धर्मरक्षण यांसाठीच्‍या अपेक्षित कृती करणे आवश्‍यक आहे.

या संदर्भात आंधप्रदेशचे उपमुख्‍यमंत्री पवन कल्‍याण यांनी ‘सनातन धर्माला पुष्‍कळ महत्त्व असून प्रत्‍येक हिंदूने त्‍याचे दायित्‍व घेतले पाहिजे. सनातन धर्मावर होणार्‍या आघातांच्‍या विरोधात मी बोलणार’, अशी ठाम भूमिका घेतली आहे. एक अभिनेता असूनही पवन कल्‍याण यांनी हिंदु धर्माविषयी प्रखर भूमिका उघडपणे मांडून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. प्रत्‍येक हिंदूनेही तोच आदर्श समोर ठेवून माता-भगिनींच्‍या रक्षणासाठी श्री दुर्गादेवीच्‍या क्षात्ररूपाची सामूहिक उपासना करण्‍याची वेळ आली आहे.

आज भारतात एकही राज्‍य असे नाही, जिथे महिला सुरक्षित आहेत. हेच लक्षात घेऊन बिहारमधील बुंदेलखंड येथील संपत पाल यांनी महिलांना एकत्र करून ‘गुलाब गँग’ सिद्ध केली. यातील प्रत्‍येक महिलेने स्‍वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले असून प्रत्‍येकीकडे काठी असते. या महिला आता केवळ स्‍वत:चे संरक्षण करत नसून इतरांचेही प्रश्‍न सोडवत आहेत. त्‍याच प्रकारे सर्वत्रच्‍या महिलांनीही किमान स्‍वत:चे संरक्षण करण्‍यासाठी कराटे, लाठी-काठी यांसारखे प्रशिक्षण घेणे आवश्‍यक आहे. श्री दुर्गादेवीच्‍या हातात शस्‍त्र असून तिने त्‍याचा वापर करून अनेक राक्षसांना ठार केले. बॉलिवूडमधील कथित भ्रमित करणार्‍या चित्रपटांमध्‍ये-गाण्‍यांमध्‍ये न अडकता देवीच्‍या शक्‍तीच्‍या रूपाची उपासना करण्‍याची आता वेळ आली आहे. ‘नवरात्रोत्‍सव म्‍हणजे केवळ गरबा किंवा दांडिया खेळण्‍याची मिळालेली संधी’, हा हिंदूंमध्‍ये असलेला चुकीचा दृष्‍टीकोन पालटायला हवा. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रत्‍येक सणामध्‍ये विकृत प्रकार शिरल्‍याचे सध्‍या आपल्‍याला पहायला मिळते. हे रोखण्‍यासाठी धर्मशिक्षणाची नितांत आवश्‍यकता आहे. हिंदु युवतींनीही नवरात्रोत्‍सवाचा काळात धर्मशिक्षण घ्‍यावे. नवरात्रोत्‍सवाच्‍या आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ करून घ्‍यावा. या काळात हिंदु संघटनांनीही हिंदु तरुणींसाठी स्‍वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करून त्‍यांच्‍यामध्‍ये जागृती निर्माण करावी. दुर्गा वाहिनी, हिंदु जनजागृती समिती आदी संघटना ठिकठिकाणी असे प्रशिक्षणवर्ग आयोजित करतात. त्‍यांचा लाभ महिला-युवतींनी घेणे अत्‍यावश्‍यक आहे.

प्रत्‍येक नवरात्रोत्‍सव मंडळाने गरबा उत्‍सवात येणार्‍या तरुणांना ओळखपत्र आणणे सक्‍तीचे करणे आवश्‍यक !