भाईंदर येथे आरोपींनी गरम पाणी फेकल्याने ६ पोलीस घायाळ !

हल्यात घायाळ झालेले पोलीस

भाईंदर – येथे गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या  पोलिसांवर आरोपींनी गरम पाणी फेकले. यात १ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ५ पोलीस कर्मचारी भाजले आहेत. (पोलिसांचा धाकच नसल्याने आरोपी त्यांच्यावर आक्रमण करतात ! – संपादक) त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणात एकूण ४ आरोपी असून त्यापैकी अजय चौबे, अभय चौबे आणि एक महिला अशा तीन  जणांना अटक करण्यात आली आहे.