मुंबईमध्ये अतिक्रमण हटवणार्‍या अधिकार्‍यांवर दगडफेकप्रकरणी ५७ जणांना अटक !

मुंबई – पवई येथील हिरानंदानी भागातील अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाईसाठी गेलेले मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी ५७ जणांना अटक केली आहे. यासह १५ जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ३ जून या दिवशी मुंबई महानगरपालिकेकडून कारवाईची नोटीस देऊन ६ जून या दिवशी कारवाई करण्यात आली होती. या वेळी एका घरावरही आक्रमण केल्याप्रकरणी २८ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.