Kangana Ranaut : फाळणीनंतर पाकिस्तान इस्लामी देश झाला, तर भारताला हिंदु राष्ट्र का बनवले नाही ?  

भाजपच्या उमेदवार कंगना राणावत यांचा प्रश्‍न !

भाजपच्या उमेदवार कंगना राणावत

मंडी (हिमाचल प्रदेश) – आपल्या पूर्वजांनी मोगलांची गुलामी केली. त्यानंतर ब्रिटिशांची गुलामी पाहिली. त्यानंतर काँग्रेसचे कुशासन पाहिले. त्यामुळे वर्ष २०१४ मध्येच आपल्याला खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले. विचारांचे स्वातंत्र्य, सनातनचे स्वातंत्र्य, आपल्या धर्माचा उत्कर्ष करण्याचे स्वातंत्र्य, आपल्या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचे स्वातंत्र्य मिळाले.

जेव्हा वर्ष १९४७ साली धर्माच्या आधारावर पाकिस्तानला ‘इस्लामिक रिपब्लिक’ (इस्लामी देश) बनवले होते, तर मग भारताला हिंदु राष्ट्र का नाही बनवले ?

भारत देशाला आम्ही हिंदु राष्ट्र बनवणार, अशी घोषणा अभिनेत्री आणि मंडी मतदारसंघातील भाजपच्या उमदेवार कंगना राणावत यांनी केली.