वीर सावरकर उवाच

वीर सावरकर

१८५७ पासून चालू झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात कुणी खरा त्याग केला ? हिंदूंनी कि मुसलमानांनी? ज्या बंगालची सत्ता सूत्रे मुसलमानांच्या हातात आहेत, त्या बंगालमध्ये जे स्वातंत्र्याचे होमकुंड अहोरात्र पेटले होते, त्यात बळी कोण गेले ? ते मुसलमान नव्हते, तर हिंदूच होते. अंदमानातील भूमी खणून पहा आणि तिथे सापडणार्‍या हुतात्म्यांच्या अस्थी बघा, म्हणजे तुम्हाला त्या सार्‍यांवर हिंदू , हिंदू अक्षरेच कोरलेली आढळतील.