मुंबईत भ्रमणभाष चोरणार्‍या दोन सराईत चोरांना अटक !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – भ्रमणभाष चोरणार्‍या दोन सराईत चोरांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३० भ्रमणभाष हस्तगत करण्यात आले. त्यांची किंमत साडेतीन लाख रुपये इतकी आहे. आरोपींविरोधात मुंबईसह इतर परिसरात अनेक गुन्हे नोंद आहेत. विक्रम भोसले आणि बंटी भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.