सावधान ! आपल्या घरी गणरायासह हलाल उत्पादने तर येत नाहीत ना ? Ganeshotsav

सध्या ‘हलाल जिहाद’ (इस्लामनुसार ‘हलाल’ म्हणजे जे वैध आहे ते) हे एक गंभीर आर्थिक संकट भारतियांवर ओढवले आहे. हलाल ही संकल्पना आता केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नाही, तर अनेक शाकाहारी पदार्थ, धान्य, खाद्यतेल, सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, शीतपेये आदीही हलाल प्रमाणित करण्यात येत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये पसरत असलेल्या अशा घातक हलाल षड्यंत्रापासून हिंदूंचे पवित्र सण-उत्सवही सुटू शकले नाहीत. गणेशोत्सवात श्री गणेशाच्या प्रतिदिनच्या नैवेद्यासाठी हिंदु भाविक मिठाई, तसेच विविध पदार्थ बाजारातून खरेदी करत असतात; पण तोच नैवेद्य अशा पद्धतीने ‘हलाल’ प्रमाणित असेल तर… ? त्यामुळे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून गणरायासह हलाल उत्पादने आपल्या घरी तर येत नाहीत ना ? एक भाविक म्हणून घरी येणारे पूजासाहित्य, श्री गणेशाचा प्रसाद, खाद्यपदार्थ ‘हलाल प्रमाणित नाहीत ना’, याची निश्‍चिती करा. (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)

१. समांतर इस्लामी अर्थव्यवस्थेची निर्मिती !

हलाल जिहादच्या माध्यमातून राष्ट्रविघातक शक्तींनी स्वतःची वेगळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. त्या माध्यमातून भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे षड्यंत्र राबवले जात आहे. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत सरकारच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (एफ्.एस्.एस्.ए.आय.) आणि ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (एफ्.डी.ए.) यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्‍या शासकीय संस्था अस्तित्वात असतांनाही ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. पूर्वी मांसापुरती असणारी मूळ ‘हलाल’ची इस्लामी संकल्पना आज ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’, ‘बर्गर किंग’, ‘पिझ्झा हट’ यांसारखी आंतरराष्ट्रीय आस्थापने हिंदु, जैन, बौद्ध, शीख अशा मुसलमानेतर समाजाला सक्तीने ‘हलाल प्रमाणित’ पदार्थ विकत आहेत. १५ टक्के मुसलमानांसाठी ८० टक्के हिंदु समाजावर हलालची सक्ती केली जात आहे.

हलाल प्रमाणीकरणातून मिळालेल्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ‘हलाल अर्थव्यवस्था’ एक मोठे संकट बनले आहे. नुकतेच भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ या संघटनेला अधिकृतपणे ‘हलाल प्रमाणपत्रा’ची मान्यता देणारे अधिसूचना (नोटिफिकेशन) प्रसारित केली आहे. जर हे लागू झाले, तर आता चालू असलेली अघोषित हलाल सक्ती अधिकृत होईल. आज हलाल प्रमाणपत्राच्या पुढे जाऊन आता ‘इस्लामिक कॉईन’ (नाणे) काढण्यात आले आहे. ‘हलाल शेअर मार्केट (समभाग विक्री बाजार) ’ चालू झाले आहे. हलाल प्रमाणपत्र हवे असेल, तर २ मुसलमान मौलानांना त्या आस्थापनांमध्ये ‘हलाल इन्स्पेक्टर (निरीक्षक)’ या नावाने वेतन देऊन कामाला ठेवावे लागणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था टिकवून ठेवायची असेल, तर हलाल सक्तीला विरोध करायला हवा.

(सौजन्य : PGurus) 

२. गणेशोत्सव ‘हलालमुक्त’ करण्यासाठी…

गणेशोत्सव हा एक मोठा उत्सव आहे. लोकमान्य टिळक यांनी परकीय सत्तेच्या विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केला. हा उद्देश साध्य करण्यासाठी गणेशोत्सव मंडळे देखावे, फ्लेक्स प्रदर्शन, व्याख्याने, हस्तपत्रके आदी माध्यमांतून ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जनजागृती करू शकतात. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’, हा ग्रंथही प्रकाशित करण्यात आला आहे. एक सर्वसामान्य भाविक म्हणूनही व्यक्तीगत स्तरावरही आपण जागृती करावी, तसेच देशाची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी सतर्कतेने खरेदी करावी.

३. ‘हलाल जिहाद’ हे आर्थिक स्तरावरील युद्ध !

अर्थसंपन्न व्यक्तीच राज्यव्यवस्थेत प्रभावशाली मानली जाते, तसेच अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणार्‍या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…? यासाठी हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करणे आवश्यक आहे. हलाल जिहाद हे आर्थिक स्तरावरील युद्धच आहे. त्यामुळे या ‘आर्थिक जिहाद’चा प्रतिकार करणे आवश्यक आहे. केवळ ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ नाही, तर ‘हलालमुक्त भारत’ होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, तसेच ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाचे लेखक (१८.९.२०२३)