आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !

नवी मुंबई – नेरूळ येथे एका झोपडीतून ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांनी अवैधपणे भारतात प्रवेश केला असून यातील दोघांनी १२ वर्षांपूर्वी आपल्या पालकांच्या समवेत, तर तिसर्या आरोपीने ६ वर्षांपूर्वी पतीसमवेत भारतात प्रवेश केला होता. अहदुल इंजील मुल्ला, रत्ना अहदुल इंजील मुल्ला आणि रिपा बिश्वास अशी आरोपींची नावे आहेत.
१. अहदुल आणि रत्ना हे दोघे १२ वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या समवेत भारतात आले होते. त्यांच्या आई-वडिलांच्या विरोधात पारपत्र कायद्यांतर्गत वर्ष २०११ मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
२. रिपा ही ६ वर्षांपूर्वी तिच्या पतीसमवेत भारतात आली होती.
हे तिघेही नेरूळ येथील अपोलो रुग्णालयाजवळील झोपडपट्टीत रहात होते. या तिघांविषयी आतंकवादविरोधी पथकाला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्यांनी तिघांना कह्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे भारतीय असल्याची कुठलीही कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. यानंतर त्यांच्यावर पारपत्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाघुसखोरांनी पोखरलेला भारत ! |
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !