महागाई भत्त्यात वाढ आणि ७ वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या (‘एस्.टी.’च्या) कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात आणखी ४ टक्के वाढ करावी, तसेच ७ वा वेतन आयोग लागू करावा, या मागण्यांसाठी एस्.टी. कर्मचार्यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली. ८ सप्टेंबरला राज्यशासनाने एस्.टी. कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के इतकी वाढ केली. त्यामुळे ३४ टक्के इतका असलेला महागाई भत्ता ३८ टक्के इतका झाला आहे. तो आणखी वाढवण्याची कर्मचार्यांची मागणी आहे.
एसटी कामगारांची पुन्हा बेमुदत उपोषणाची हाक, प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी करणार बेमुदत उपोषण, ११ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार
— Political Katta (@PoliticalKattaa) September 9, 2023
राज्यशासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास १३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप करण्याची चेतावणी एस्.टी. कर्मचार्यांच्या संघटनेने दिली आहे.
देवीच्या चांदीच्या मुकुटाची चोरी !
मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Muslims Opposed : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’
महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै या कालावधीत होणार !
Telegram Blocked : ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतात टेलिग्रामवर बंदी