स्‍वत:च्‍या संकल्‍पापेक्षा धर्मविजयाला महत्त्व देणारे भगवान श्रीकृष्‍ण ! – विनोद कुमार यादव, वैशाली, बिहार

पांडवांच्‍या पक्षात प्रत्‍यक्ष भगवान श्रीकृष्‍णांनी सुद्धा आपला संकल्‍प मोडला. युद्धापूर्वी ते म्‍हणाले होते, ‘मी शस्‍त्र उचलणार नाही.’ तथापि भगवान श्रीकृष्‍णांनी सांगितले, ‘माझे वचन मोडले, तरी चालेल; परंतु हे धर्मयुद्ध जिंकले पाहिजे.’ यासाठीच भगवान श्रीकृष्‍ण यांनी रथाचे चाक हातात घेतले. भगवान श्रीकृष्‍णांचे तेे रूप घेऊन आपल्‍याला मार्गक्रमण करायचे आहे.