
मुंबई – आरे वसाहतीच्या तलावांमध्ये यावर्षी श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाला अनुमती मिळणार नाही, असे पत्र ‘आरे’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी मुंबई महानगरपालिकेस ‘वनशक्ती’ या संघटनेच्या आग्रहावरून पाठवले आहे. ‘हा निर्णय तात्काळ पालटावा’, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. ‘कुठल्याही परिस्थितीत आरे वसाहतीच्या तलावातच यावर्षीही परंपरा कायम राखत सार्वजनिक आणि खासगी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होईल’, असे भातखळकर यांनी स्पष्ट केले आहे.
कित्येक वर्षांपासून येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. ‘वनशक्ती’ संघटना ही नेहमीच हिंदु समाज आणि विकास यांच्या प्रश्नांच्या विरोधात भूमिका घेते’, असा आरोपही आमदार भातखळकरांनी केला आहे. ‘ही बंदी तात्काळ उठवावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र