
मुंबई – आरे वसाहतीच्या तलावांमध्ये यावर्षी श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाला अनुमती मिळणार नाही, असे पत्र ‘आरे’च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी मुंबई महानगरपालिकेस ‘वनशक्ती’ या संघटनेच्या आग्रहावरून पाठवले आहे. ‘हा निर्णय तात्काळ पालटावा’, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे. ‘कुठल्याही परिस्थितीत आरे वसाहतीच्या तलावातच यावर्षीही परंपरा कायम राखत सार्वजनिक आणि खासगी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होईल’, असे भातखळकर यांनी स्पष्ट केले आहे.
कित्येक वर्षांपासून येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. ‘वनशक्ती’ संघटना ही नेहमीच हिंदु समाज आणि विकास यांच्या प्रश्नांच्या विरोधात भूमिका घेते’, असा आरोपही आमदार भातखळकरांनी केला आहे. ‘ही बंदी तात्काळ उठवावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !