छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

गडहिंग्‍लज (जिल्‍हा कोल्‍हापूर) – छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्‍फ’चा काळा कायदा रहित करण्‍यात यावा, अशा मागणीचे केंद्रीय विधी आणि न्‍याय मंत्री यांच्‍या नावे असलेले निवेदन गडहिंग्‍लज येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नायब तहसीलदार विष्‍णु बुट्टे यांना दिले.

या प्रसंगी भाजपचे चंदगड विधानसभा विस्‍तारक श्री. संदीप नाथबुवा, ‘आजी-माजी सैनिक संघटने’चे कार्याध्‍यक्ष श्री. दादासाहेब किल्लेदार, हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. दीपक भादवणकर आणि श्री. अक्षय मोरे, धर्मप्रेमी श्री. सर्जेराव चौगुले आणि श्री. विश्‍वास बुगडे, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. मनोज पोवार, राष्‍ट्रप्रेमी सर्वश्री रवि चौगुले, अक्षय पोवार, हेमंत रांगणेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद धनवडे यांसह अन्‍य उपस्‍थित होते.

ईश्‍वरपूर (जिल्‍हा सांगली) – याच मागणीसाठी ईश्‍वरपूर येथे तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देण्‍यात आले. या प्रसंगी हिंदुत्‍वनिष्‍ठ सर्वश्री विजय कळसे, अजित जाधव, दीपक पटेल, धर्मप्रेमी सौ. रेखा मोरे, समिधा खोत, राष्‍ट्रप्रेमी सर्वश्री ललित तुळसणकर, सुहास दळवी, गणेश पाटील, नंदकुमार शिवगुंडे, हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. सुरेखा पाटील आणि श्री. भरत जैन उपस्‍थित होते.

ईश्‍वरपूर (जिल्‍हा सांगली) येथे तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ, राष्‍ट्रप्रेमी