कोरोना काळात शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करून श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याचे प्रकरण

रत्नागिरी – कोरोना काळात शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करून श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी वर्ष २०२० मध्ये ११ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या सर्वांची आता निर्दोष मुक्तता केली. या नागरिकांच्या वतीने अधिवक्ता अविनाश शेट्ये यांनी युक्तीवाद केला.
कोरोना काळात त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी येथील जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मनाई आणि जमावबंदी केली होती. याच कालावधीत ३० जून २०२० सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास श्री भैरीची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे या प्रकारणी पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. या खटल्यादरम्यान दोघांचे निधन झाले होते. त्यामुळे ११ जणांवर गुन्हा नोंद करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवण्यात आले. नागरिकांच्या दोषसिद्धीसाठी कोणताही सबळ, संयुक्त पुरावा न्यायालयापुढे ठेवण्यात आलेला नसल्याने सर्वांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली.
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम