गड-दुर्गांच्‍या दुर्दशेला कारणीभूत घटक !

• सरकार आणि प्रशासन यांची अनास्‍था

• पुरातत्‍व विभागाची उदासीनता

• नागरिकांमध्‍ये गडसंवर्धनाविषयी असणारी अनभिज्ञता

• ऐतिहासिक वारशांविषयी जागृती केली न जाणे

• गड-दुर्गांकडे ऐतिहासिक स्‍थळाऐवजी पर्यटनक्षेत्र म्‍हणून पहाण्‍याची दृष्‍टी विकसित झालेली असणे

• गड-दुर्गांवर मद्य किंवा अन्‍य मेजवानी केली जाणे

• गड-दुर्गांच्‍या माध्‍यमातून ज्‍वलंत आणि धगधगता इतिहास जागृत ठेवण्‍याची उर्मीच नसणे

• गड-दुर्गांच्‍या संवर्धनासाठी देण्‍यात येणारा निधीचा तुटवडा

• वारसारूपी वैभवाचे जतन करण्‍यासाठी इच्‍छाशक्‍तीचा अभाव

♦ गड-दुर्गांच्‍या दुःस्‍थितीच्‍या माध्‍यमातून शिवरायांचा ज्‍वलंत इतिहास खितपत पडलेला आहे ! त्‍याला पुनर्झळाळी मिळण्‍यासाठी सर्वंकष स्‍तरावर प्रयत्न व्‍हावेत !