‘ईश्वर सर्वज्ञानी आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असल्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्ञान मिळवणे, ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. आपण कितीही शिकलो, तरी ते अल्पच असते. आपण शिकत असतांना ‘मी अज्ञानी आहे’, याची जाणीव ठेवून ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया केली पाहिजे. त्यामुळे ‘मी’पणा अल्प होणे आणि ज्ञानातील चैतन्य अनुभवता येणे, असे दोन लाभ होतात. या दोन्ही लाभांमुळे आनंद अनुभवता येतो. याउलट शिकवण्यामध्ये ‘मला येते’, हा अहं वाढत जातो आणि ज्ञानातील चैतन्य अनुभवता येत नाही. त्यामुळे शिकवण्याच्या भूमिकेत रहाण्यात हानी अधिक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.९.२०२१)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > साधनाविषयक चौकट > शिकवण्यापेक्षा शिकण्याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे
शिकवण्यापेक्षा शिकण्याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे
नूतन लेख
- हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !
- पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या खोलीत निवासासाठी राहिल्यामुळे त्यांच्या माध्यमातून चैतन्य मिळून २ साधिकांच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता उणावणे
- शांत आणि प्रेमळ स्वभाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला त्रिवेंद्रम् (केरळ) येथील कु. आयुष साईदीपक (वय ९ वर्षे) !
- रेल्वेने प्रवास करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान असलेले ‘नागोठणे’ हे नाव वाचल्यानंतर साधिकेच्या विचारप्रक्रियेत झालेले सकारात्मक पालट !
- साधकांनो, तीर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र आणि चैतन्यमय अशा सनातनच्या आश्रमात राहून चैतन्याचा लाभ करून घ्या अन् आंतरिक समाधानाची अनुभूती घ्या !
- सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना रामनाथी (गोवा) आश्रमातील श्रीमती मनीषा विजय केळकर (वय ६८ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !