
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत आणि कुंकवाची उधळण करत विजयादशमीच्या पहाटे श्री तुळजाभवानीदेवीचे सीमोल्लंघन साजरे झाले. भिंगार (जिल्हा नगर) येथून आलेल्या मानाच्या पलंग पालखीचे तुळजाभवानी मंदिरात आगमन झाले. परंपरागत मार्गाने ही पलंग पालखी पायी चालत आली. नगर जिल्ह्यातील सहस्रो भाविक या पालखी यात्रेमध्ये सहभागी झाले होते. देवीला १०८ साड्यांचे दिंड गुंडाळण्यात आले. तुळजाभवानीदेवीची मूर्ती मुख्य सिंहासनावरून उचलून ती मानाच्या पालखीमध्ये बसवण्यात आली. त्यानंतर पालखीमधून तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात प्रदक्षिणा घालण्यात आली.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अन्य मान्यवर आणि सहस्रो भाविक भक्त तुळजाभवानी मंदिरात उपस्थित होते.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !