सांगली जिल्ह्यात साधूंना मारहाण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ! – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल

प्रांत कार्यालयात निवेदन देतांना विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १६ सप्टेंबर (वार्ता.) – सांगली जिल्ह्यातील लवंगा या गावी साधूंना मारहाण करणारा जमाव नेमका कोणता होता ? मुले पळवणारी टोळी ही केवळ हिंदु साधूंमध्येच कशी दिसते ? कधी हिरवी चादर घेऊन फिरणार्‍या फकिरांमध्ये कशी दिसत नाही ? असे प्रश्न पालघर साधू हत्याकांडापासून अनुत्तरित आहेत. अशा घटना या हिंदूंची श्रद्धा असणार्‍या साधू-संत यांना प्रताडीत करून हिंदूंचे मनोबल खच्चीकरण करण्याचे हे सुनियोजित षड्यंत्र आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील लवंगा येथे साधूंना मारहाण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने प्रांत कार्यालयात देण्यात आले.

या प्रसंगी सर्वश्री बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, सोमेश्वर वाघमोडे, अनुप हल्याळकर, रावसाहेब चौगुले, संदीप जाधव, अनिल सातपुते यांसह अन्य उपस्थित होते.