मुंबई – कल्याण येथे जलद डाऊन मार्गावरील रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या २ ट्रॅकमन्सनी (रूळ दुरुस्त करणारे कर्मचारी) प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत लाल सिग्नल दाखवून एक्सप्रेस थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्या वेळी इंद्रायणी एक्सप्रेस वेगाने येत होती. ट्रॅकमन्सच्या सतर्कतेमुळे ६ सप्टेंबर या दिवशी सकाळी रेल्वेचा मोठा अपघात टळला. या नंतर या मार्गावरील लोकलगाड्यांची वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास रूळ दुरुस्त करण्यात आला.
ट्रॅकमन्समुळे रेल्वेचा अपघात टळला
नूतन लेख
- सिंधुदुर्ग : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील दोडामार्ग तालुक्यात खनिजाचे उत्खनन चालू
- Land Encroachment : पर्यटन खात्याच्या हणजूण येथील भूमीतील उर्वरित अतिक्रमण १५ दिवसांत हटवा ! – मुंबई उच्च न्यायालय, गोवा
- पुणे येथे मराठी भाषेत अधिवक्त्यांना सनद देण्याचा कार्यक्रम !
- अकरावीच्या कोट्यांतर्गत प्रवेशातील अर्ध्यांहून अधिक जागा रिकाम्या !
- प्रक्षोभक वक्तव्यावरून आमदार नीतेश राणे आणि गीता जैन यांवर गुन्हा नोंद !
- रायगड जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !