‘पालकांनी अभ्यासात लक्ष दे’ म्हटल्याचा राग आल्याने नववीतील मुलाची गळफास घेऊन आत्महत्या !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पिंपरी – ‘अभ्यासात लक्ष दे, मोबाईलचा वापर कमी कर’, असे पालकांनी सांगितले म्हणून राग आल्याने नववीत शिकणार्‍या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिघी येथे घडली असून बद्रीनाथ विष्णु राठोड (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. दिघी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

मानसिक दुर्बलतेने ग्रासलेल्या पिढीला संस्कारक्षम आणि सुदृढ बनवण्यासाठी धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे हेच यावरून लक्षात येते.