स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘भारताच्या संदर्भातील स्वातंत्र्यापूर्वीच्या अपेक्षा आणि सद्य:स्थिती’ या संदर्भात आपले मत कळवा !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांना आवाहन !

भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होत आली आहेत. या कालावधीत अनेक राजकीय पक्षांचे राजकारणी सत्तेवर आले. आता राष्ट्र अन् धर्म यांची सद्य:स्थिती पहाता सर्वच स्तरांवर आपली अपरिमित हानी झालेली दिसून येते. त्यामुळे ‘स्वातंत्र्यानंतर आपल्याला अपेक्षित असे राष्ट्र निर्माण झाले आहे का ?’, असा प्रश्न निर्माण होतो. यासंदर्भात वाचकही त्यांचे मत पुढील पत्त्यावर लिहून पाठवू शकतात.

संपादक,
दैनिक ‘सनातन प्रभात’
पत्ता –  पोस्ट बॉक्स क्र. ४६, फोंडा, गोवा.
दू.क्र. : (०८३२) २३१२६६४
ई-मेल : [email protected].