
‘इंग्रजांच्या इंग्रजी भाषेसाठी आजची युवा पिढी पूर्णत: वेडी झाली आहे. इंग्रजांनी ज्या ७० देशांवर राज्य केले, त्या सर्व देशांपैकी चीन, जर्मनी असे ११ देश सोडल्यास अन्य सर्वांनी इंग्रजी भाषेचा स्वीकार केला; परंतु आज ते ११ देश अतीविकसित आहेत. जर हे देश इंग्रजी भाषेखेरीज विकसित होऊ शकतात, तर त्या तुलनेत आपल्या हिंदीचे व्याकरण तर अतीविशाल आहे. त्याचसमवेत संस्कृत तर महासागराप्रमाणे आहे. संस्कृतचे महत्त्व आता सर्वजण मान्य करू लागले आहेत. असे आहे, तर आपण विकसित का होऊ शकत नाही ? ‘हिंदीचा स्वीकार करा, इंग्रजीला हटवा आणि देश वाचवा !’, या घोषवाक्यानुसार प्रयत्न करूया.’
(साभार : पू. तनुजा ठाकूर, संपादिका, मासिक ‘वैदिक उपासना’, १३ डिसेंबर २०१९ ते १० जानेवारी २०२०)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !