
‘आजतागायत वेगवेगळ्या साधकांनी अनेक क्षात्रगीते लिहिली आहेत; मात्र गुरुदेवांनी लिहिलेले एकमेव क्षात्रगीत, म्हणजे आदिशक्तीचे स्तवन होय !
आदिशक्ति तू, अंतशक्ति तू ।
जगज्जननी तू, लयकारी तू ।
या पहिल्या २ ओळींमध्ये गुरुदेवांनी आदिशक्तीचे स्वरूप वर्णन केले आहे आणि उर्वरित ओळींमध्ये आदिशक्तीच्या कार्याची व्याप्ती अन् तिचा महिमा वर्णन केला आहे. गुरुदेवांनी हे शक्तिस्तवन अनेक वर्षे विविध कार्यक्रमांमध्ये साधकांकडून म्हणवूनही घेतले आहे. आता गुरुदेवांच्या कार्यासाठी, म्हणजेच धर्मसंस्थापनेसाठी आदिशक्तीचे अवतरण झाले आहे.

‘हे आदिशक्ति, तूच आम्हाला शक्ती, बुद्धी, आरोग्य, धैर्य, भक्ती आणि भाव दे अन् आपत्काळातून तरून जाण्यासाठी तुझे कवच दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
– श्रीदुर्गासप्तशति, अध्याय ५, श्लोक ३२
अर्थ : जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीरूपाने विराजमान आहे, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.’
– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान. (१६.९.२०२१)
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !