
सांगली, ६ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनामुळे लागू केलेल्या दळणवळण बंदीनंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असतांना सांगली शहरातील अनेक उपनगरांमधील बससेवा बंद अथवा अल्प प्रमाणात आहे. उपनगरामधील वयोवृद्धांना औषधे आणि उपचार घेण्यासाठी सरकारी रुग्णालयात जावे लागते, तसेच सामान्यांना कामासाठी शहरात यावे लागते. मुख्य शहरापासून उपनगरे लांब असल्याने शहरात जाण्यासाठी सकाळी ९ ते १०, तसेच परत येण्यासाठी सायंकाळी ५ ते ६ बससेवा चालू करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने आगार नियंत्रणप्रमुख सलगर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. (सर्वसामान्यांना येत असलेल्या अडचणी सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाच्या का लक्षात येत नाहीत ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ? – संपादक)
या वेळी भारतीय जनता पक्ष सचिव विश्वजीत पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष कृष्णा राठोड, युवा नेते समीर भोसले, युवा मोर्चा प्रदेश सदस्य चेतन माडगूळकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष अमित देसाई हे उपस्थित होते.
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
अडचणी असल्या, तरी जलजीवन मिशन योजना पूर्ण करावीच लागेल !
अनधिकृत डोंगर कापणी केल्यास १ कोटी रुपयांपर्यंत दंड