
काठमांडू (नेपाळ) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळणे आणि त्यांचा विरोध करणे अशी कृत्य करत आंदोलन करणार्यांना नेपाळ सरकारने चेतावणी दिली आहे. ‘नेपाळ भारताशी मैत्रीचे संबंध ठेवू इच्छित असल्याने सरकार अशा घटना सहन करणार नाही’, असे नेपाळच्या साम्यवादी सरकारने म्हटले आहे.
#Nepal warns protesters not to burn effigy of PM #NarendraModi https://t.co/kvhNkfHT0H
— Zee News English (@ZeeNewsEnglish) September 5, 2021
१. काही दिवसांपूर्वी नेपाळच्या सीमेवरून जयसिंह धामी नावाचा तरुण नदी पार करून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. तो तारेच्या साहाय्याने नदी पार करत असतांना तार कापल्याने धामी नदीत पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. भारतीय सशस्त्र सैन्यदलाच्या अधिकार्याने तार कापल्याचा नेपाळच्या नागरिकांनी आरोप करत पंतप्रधान मोदी यांचा पुतळा जाण्यात आला. सशस्त्र दलाने मात्र त्याच्या अधिकार्याने अशा प्रकारची कोणतीही कृती केली नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावला आहे.
२. नेपाळच्या गृहमंत्रालयाने म्हटले की, नेपाळची परंपरा शेजारी देशाशी वाद घालण्याऐवजी चर्चा करून तो सोडवण्याची आहे. भविष्यातही अशाच प्रकारे वाद सोडवता येऊ शकतो.
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप