
नवी देहली – कोरोनामुळे गेल्या वर्षी पंढरपूरची पायी वारी रहित करण्यात आली होती. यंदाही राज्यशासनाने पायी वारीला अनुमती दिलेली नाही; मात्र प्रमुख १० दिंड्यांना बसद्वारे जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. राज्यशासनाने घेतलेल्या या निर्णयाला संत नामदेव महाराज संस्थानने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने १९ जुलैला झालेल्या सुनावणीच्या वेळी ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व दिंड्या आणि वारकरी यांना अनुमती देण्याची मागणी फेटाळली.
Supreme Court Dismisses Plea To Allow Millions Of Warkaris To Perform Pilgrimage To Temple In Pandharpur https://t.co/dqxLgxiwtJ
— Live Law (@LiveLawIndia) July 19, 2021
‘आषाढी वारीसाठी राज्यशासनाने लाखो वारकर्यांसह नोंदणीकृत २५० पालख्यांना वारीची अनुमती नाकारली आहे. हा निर्णय म्हणजे वारकर्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघनच आहे’, असे या याचिकेत म्हटले होते.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, विठ्ठल भेटीला निघाला सागर !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था